शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शेकडो कुटुंबांनी केले स्थलांतर

By admin | Updated: August 6, 2016 00:28 IST

खडकवासला धरणातून दुपारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्री आठपासून ४२ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार.

पुणे : खडकवासला धरणातून दुपारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्री आठपासून ४२ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार. पुन्हा सिंहगड रस्ता, पाटील इस्टेट झोपडपट्टी, रजपूत झोपडपट्टी, मंगळवार पेठ, कामगार पुतळा झोपडपट्टी आदी ठिकाणच्या शेकडो कुटुंबीयांना स्थलांतर करावे लागले आहे. नदीकाठच्या परिसरात आपत्ती व्यवस्थापन विभागाची गाडी रात्रभर गस्त घालत होती.दोन दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर सिंहगड रस्ता परिसरातील सोसायट्यांसह नदीकाठच्या झोपडपट्ट्यांमधील अनेक कुटुंबे शाळा, मंगल कार्यालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी ओसरल्यावर पुन्हा ही कुटुंबे घरी परतली. गुरुवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला. शुक्रवारी दिवसभर धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस कोसळल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये ८६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरणातून खडकवासाला धरणाच पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने परिस्थिती आणखीच गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाकडून दक्षता घेण्यास सुरुवात झाली आहे. अग्निशामक दल, पोलीस व महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षातील कर्मचारी नदीकाठच्या परिसरात तैनात करण्यात आले. झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या कुटुंबांना शाळांमध्ये स्थलांतरित केले. त्यांची तिथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. रजपूत झोपडपट्टीच्या राजीव गांधी वसाहतीमधील ६ कुटुंबांना व पुलाची वाडी येथील १६ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले.(प्रतिनिधी)>स्थलांतरांचा प्रश्न लालफितीत...मंगळवार पेठेतील जुन्या बाजाराच्या मागील झोपडपट्टीमधील नदीकाठच्या ४०० कुटुंबांना सातत्याने बाधित व्हावे लागत असल्याने त्यांना हडपसर येथील महापालिकेच्या घरांमध्ये बीएसयूपीअंतर्गत स्थलांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. नागरिकांनीही तिथे जाण्याची तयारी दर्शविली आहे; मात्र महापालिका प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे त्या नागरिकांचे अद्याप स्थलांतर होऊ शकलेले नाही. ऐन पावसाळ्यात नदीचे पाणी शिरून कुटुंबांना विस्थापित व्हावे लागत असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या कुटुंबांचे तातडीने बीएसयूपी योजनेअंतर्गत प्रशासनाकडून स्थलांतर केले जावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अजय तायडे यांनी केली.