शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

शेकडो कुटुंबांनी केले स्थलांतर

By admin | Updated: August 6, 2016 00:28 IST

खडकवासला धरणातून दुपारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्री आठपासून ४२ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार.

पुणे : खडकवासला धरणातून दुपारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्री आठपासून ४२ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार. पुन्हा सिंहगड रस्ता, पाटील इस्टेट झोपडपट्टी, रजपूत झोपडपट्टी, मंगळवार पेठ, कामगार पुतळा झोपडपट्टी आदी ठिकाणच्या शेकडो कुटुंबीयांना स्थलांतर करावे लागले आहे. नदीकाठच्या परिसरात आपत्ती व्यवस्थापन विभागाची गाडी रात्रभर गस्त घालत होती.दोन दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर सिंहगड रस्ता परिसरातील सोसायट्यांसह नदीकाठच्या झोपडपट्ट्यांमधील अनेक कुटुंबे शाळा, मंगल कार्यालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी ओसरल्यावर पुन्हा ही कुटुंबे घरी परतली. गुरुवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला. शुक्रवारी दिवसभर धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस कोसळल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये ८६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरणातून खडकवासाला धरणाच पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने परिस्थिती आणखीच गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाकडून दक्षता घेण्यास सुरुवात झाली आहे. अग्निशामक दल, पोलीस व महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षातील कर्मचारी नदीकाठच्या परिसरात तैनात करण्यात आले. झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या कुटुंबांना शाळांमध्ये स्थलांतरित केले. त्यांची तिथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. रजपूत झोपडपट्टीच्या राजीव गांधी वसाहतीमधील ६ कुटुंबांना व पुलाची वाडी येथील १६ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले.(प्रतिनिधी)>स्थलांतरांचा प्रश्न लालफितीत...मंगळवार पेठेतील जुन्या बाजाराच्या मागील झोपडपट्टीमधील नदीकाठच्या ४०० कुटुंबांना सातत्याने बाधित व्हावे लागत असल्याने त्यांना हडपसर येथील महापालिकेच्या घरांमध्ये बीएसयूपीअंतर्गत स्थलांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. नागरिकांनीही तिथे जाण्याची तयारी दर्शविली आहे; मात्र महापालिका प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे त्या नागरिकांचे अद्याप स्थलांतर होऊ शकलेले नाही. ऐन पावसाळ्यात नदीचे पाणी शिरून कुटुंबांना विस्थापित व्हावे लागत असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या कुटुंबांचे तातडीने बीएसयूपी योजनेअंतर्गत प्रशासनाकडून स्थलांतर केले जावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अजय तायडे यांनी केली.