शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

शेकडो कुटुंबांनी केले स्थलांतर

By admin | Updated: August 6, 2016 00:28 IST

खडकवासला धरणातून दुपारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्री आठपासून ४२ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार.

पुणे : खडकवासला धरणातून दुपारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्री आठपासून ४२ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार. पुन्हा सिंहगड रस्ता, पाटील इस्टेट झोपडपट्टी, रजपूत झोपडपट्टी, मंगळवार पेठ, कामगार पुतळा झोपडपट्टी आदी ठिकाणच्या शेकडो कुटुंबीयांना स्थलांतर करावे लागले आहे. नदीकाठच्या परिसरात आपत्ती व्यवस्थापन विभागाची गाडी रात्रभर गस्त घालत होती.दोन दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर सिंहगड रस्ता परिसरातील सोसायट्यांसह नदीकाठच्या झोपडपट्ट्यांमधील अनेक कुटुंबे शाळा, मंगल कार्यालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी ओसरल्यावर पुन्हा ही कुटुंबे घरी परतली. गुरुवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला. शुक्रवारी दिवसभर धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस कोसळल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये ८६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरणातून खडकवासाला धरणाच पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने परिस्थिती आणखीच गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाकडून दक्षता घेण्यास सुरुवात झाली आहे. अग्निशामक दल, पोलीस व महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षातील कर्मचारी नदीकाठच्या परिसरात तैनात करण्यात आले. झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या कुटुंबांना शाळांमध्ये स्थलांतरित केले. त्यांची तिथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. रजपूत झोपडपट्टीच्या राजीव गांधी वसाहतीमधील ६ कुटुंबांना व पुलाची वाडी येथील १६ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले.(प्रतिनिधी)>स्थलांतरांचा प्रश्न लालफितीत...मंगळवार पेठेतील जुन्या बाजाराच्या मागील झोपडपट्टीमधील नदीकाठच्या ४०० कुटुंबांना सातत्याने बाधित व्हावे लागत असल्याने त्यांना हडपसर येथील महापालिकेच्या घरांमध्ये बीएसयूपीअंतर्गत स्थलांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. नागरिकांनीही तिथे जाण्याची तयारी दर्शविली आहे; मात्र महापालिका प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे त्या नागरिकांचे अद्याप स्थलांतर होऊ शकलेले नाही. ऐन पावसाळ्यात नदीचे पाणी शिरून कुटुंबांना विस्थापित व्हावे लागत असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या कुटुंबांचे तातडीने बीएसयूपी योजनेअंतर्गत प्रशासनाकडून स्थलांतर केले जावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अजय तायडे यांनी केली.