शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 10:10 IST

राज्यात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षण सेवकांना तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आहे.

दीपक भातुसे लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : राज्यात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षण सेवकांना तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आहे. या कमी मानधनात संसाराचा गाडा चालवणे अवघड होत असल्याने मानधन कालावधी रद्द करावा, अशी मागणी होत आहे. राज्यात २८ हजार शिक्षण सेवक असून, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक व अनुकंपामार्फत भरले गेलेले शिपाई पदे, असे जवळपास हजारो कर्मचारी हे मानधन तत्त्वावर काम करीत आहेत.

एप्रिल २०२५ पासून राज्य सरकारने मानधन तत्त्वावर शिक्षण सेवक पदांची भरती सुरू केली. नियुक्तीपासून शिक्षण सेवकांना तीन वर्षे मानधन पद्धतीवर काम करावे लागते. त्याऐवजी शिक्षण सेवकांसाठी भरतीनंतर फक्त एक वर्षाचा परिविक्षाधीन (प्रोबेशन) कालावधी ठेवावा व या कालावधीत नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्ण पगार मिळावा, अशी शिक्षण सेवकांची मागणी आहे.  

शासकीय नोकर भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या बहुतेक उमेदवारांचे सरासरी वय ३५ ते ३८ झाले आहे. त्यात शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर तीन वर्षांचा मानधन कालावधी असल्यामुळे वाढत्या वयाबरोबर मानधन कालावधीमुळे मानसिक ताणतणाव वाढला आहे. 

"वर्षानुवर्षे अभ्यास करून वयाच्या ३०-३५ व्या वर्षी नोकरी लागल्यावर पुढे तीन वर्षे मानधनावर काम करावे लागते. त्यामुळे आर्थिक व मानसिक परिस्थिती ढासळत आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून गेल्यावर १०-१५ हजारांवर संसाराचा गाडा चालविणे अवघड होते."-  महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन

"राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात शिक्षण सेवक पद रद्द करावे, असे स्पष्ट आदेश असतानाही शिक्षण सेवकांना मानधनावर काम करावे लागत आहे. शासनाच्या विविध विभागातील पदभरतीत मूळ वेतनावर नियुक्ती होते. त्यामुळे शासनाने मानधन कालावधी रद्द करावा."- प्रशांत शिरगूर, समन्वयक, पवित्र पोर्टल शिक्षण सेवक कृती समिती   

"मी मूळ धाराशिव जिल्ह्यातील असून, माझी निवड रायगड जिल्ह्यात झाली आहे. सरळसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन परत ३ वर्षे मानधनावर काम करीत आहे. महागाईच्या काळात जीवन जगणे अवघड होत चालले आहे."मी मूळ धाराशिव जिल्ह्यातील असून, माझी निवड रायगड जिल्ह्यात झाली आहे. सरळसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन परत ३ वर्षे मानधनावर काम करीत आहे. महागाईच्या काळात जीवन जगणे अवघड होत चालले आहे." - प्रतीक्षा जाधव, शिक्षण सेविका

टॅग्स :Educationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्रTeacherशिक्षक