शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

खड्ड्यांमुळे किती बळी जायची वाट पाहताय ? हायकोर्टाचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 12:51 PM

खड्ड्यांमुळे आणखी किती जीव जाण्याची वाट पाहत आहात, असा थेट सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला आणि महापालिका प्रशासनाला विचारला आहे

ठळक मुद्दे खड्ड्यांमुळे आणखी किती जीव जाण्याची वाट पाहत आहात, असा थेट सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला आणि महापालिका प्रशासनाला विचारला आहेखड्ड्यांच्या मुद्द्यावर सुनावणी करताना कोर्टाने सरकार आणि महापालिका प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. 

मुंबई, दि. 3- राज्यातील जनतेला चांगले रस्ते देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. पण हेच कर्तव्य तुम्ही पूर्ण करत नाही, ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो आहे. खड्ड्यांमुळे आणखी किती जीव जाण्याची वाट पाहत आहात, असा थेट सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला आणि महापालिका प्रशासनाला विचारला आहे. खड्ड्यांच्या मुद्द्यावर सुनावणी करताना कोर्टाने सरकार आणि महापालिका प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. 

रस्ते आणि खड्ड्यांच्या प्रश्नांवर तुम्ही तयार केलेल्या समित्यांवर आता आमची 'सुपर कमिटी' नेमावी, असं आम्हाला वाटायला लागलं आहे, असं मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लुर यांनी म्हंटलं आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईसह राज्यभरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं. खड्डे बुजविण्यासाठी केलेलं डांबरीकरणही पावसामुळे वाहून जातं आणि रस्त्यावर पुन्हा खड्डे पाहायला मिळतात. या मुद्द्याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने २०१३ मध्ये स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. तेव्हा सरकारच्या निष्काळजीपणावर आणि निष्क्रियतेला कोर्टाकडून चांगलंच सुनविण्यात आलं होतं. याच याचिकेच्या आधारे, काही वकिलांनी खड्ड्यांच्या प्रश्नाकडे न्यायमूर्तींचं लक्ष वेधलं. गेल्या काही दिवसांत खड्डयांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागल्याचं या वकिलांनी न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिलं. तेव्हा, मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने सरकारला चांगलंच फटकारलं.  खड्ड्यांचा प्रश्न फक्त मुंबईतच नाही, तर संपूर्ण राज्यात आहे. आपण नागरिकांना चांगले रस्तेही देऊ शकत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे. खड्ड्यांमुळे आणखी किती जणांचा जीव जावा, असं तुम्हाला वाटतं?, असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला. स्थानिक प्रशासन खड्ड्यांची दखल घेत नसेल तर नागरिकांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांकडे आपल्या तक्रारी पोहोचवाव्यात, अशी सूचना मुंबई हायकोर्टाने दिली आहे.