शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

असा झाला होता राज्य बँकेचा घोटाळा

By अतुल कुलकर्णी | Updated: August 23, 2019 12:22 IST

अनेक धक्कादायक गोष्टी राज्य बँकेत घडल्या होत्या. त्यावर नाबार्डने गोपनिय अहवाल दिला होता. हा अहवाल लोकमतने मिळवून बँकेचे घोटाळे बाहेर आणले होते.

- अतुल कुलकर्णीमुंबई : राज्य सहकारी बँकेच्या तत्कालिन संचालक मंडळानेच ही बँक अडचणीत आणली, शेकडो चुका केल्या, बँकेचे २७०३.८६ कोटी रुपयांचे एनपीए झाले होते, स्वत:च्या अधिकारात नसताना बँकेने हाऊसिंग फायनान्सला १०० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, अशा अनेक धक्कादायक गोष्टी राज्य बँकेत घडल्या होत्या. त्यावर नाबार्डने गोपनिय अहवाल दिला होता. हा अहवाल लोकमतने मिळवून बँकेचे घोटाळे बाहेर आणले होते. या संचालक मंडळात भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्य होते.बँकचे संचालक मंडळ असताना ३१ मार्च २०१० रोजी बँकेच्या ठेवी २१,४२० होत्या. पुढे संचालक मंडळ बरखास्त झाल्यावर ७ मे २०११ रोजी या ठेवी १६,७७२ रुपयांवर आल्या. तर प्रशासकांच्या काळात म्हणजे ३० ऑगस्ट २०१४ रोजी बँकेच्या ठेवी ११,८०० रुपयांवर आल्या होत्या. त्यावेळी संचालक मंडळाच्या काळात ठेवी जास्त दिसत असल्या तरी त्या जास्तीचे व्याज देऊन  आणल्या गेल्या होत्या. व्याजाएवढेही उत्पन्न त्यातून मिळत नव्हते असे तेव्हा प्रमोद कर्नाड यांनी सांगितले होते. यातच सगळे काही आले. बँकेचे १६१० कोटी रुपये १६ साखर कारखान्यांनी थकवले होते. तर याच कारखान्यांनी साखर विकून आलेले पैसे देखील बँकेच्या कर्जखात्यात भरले नव्हते. ग्रामीण कर्जपुरवठ्याची, शेतीसाठीच्या कर्जाची सोय करणे हे या बँकेचे मुख्य काम होते पण चुकीच्या पध्दतीने बँक वर्षानुवर्षे चालवली गेली आणि आता आपल्याच नाकातोंडात पाणी जाऊ लागल्यानंतर राज्य बँकेने बडतर्फ संचालकांनी घालून दिलेल्याच पायवाटेने जात १७ सहकारी कारखाने खाजगीकरणात विकून टाकले आणि आम्हाला आमचे पैसे मिळाले याची शाबासकीही मिळवली होती.संचालक मंडळाची संख्या ५२ वरुन २८ आणा अशी महत्वाची शिफारसही नाबार्डने केली होती. विशेष म्हणजे सहकारी चळवळीच्या शताब्दी वर्षात (सन २०११) ही बँक दिवाळखोरीत आली होती. राज्य बँकेची दिवाळखोरी जाहीर झाली असती तर ५७२ नागरी सहकारी बँका, ३१ जिल्हा बँका, १००९ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अडचणीत आल्या असत्या. लोकमतच्या मालिकेनंतर राज्यभर राजकीय गहजब झाला. त्यावेळी एकनाथ खडसे विरोधी पक्ष नेते होते. विधानसभेचे अधिवेशन चालू होते. यावर भाषण करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री व तेव्हाचे भाजपाचे धडाडीचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषण करण्याआधी लोकमतकडून सगळा अहवाल मागून घेतला होता आणि भाषण केले होते. शेवटी केंद्र सरकारने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची शिफारस केली व रिझर्व्ह बँकेने मंडळ बरखास्त करण्यास मान्यता दिली आणि ७ मे २०११ रोजी सहकार विभागाने संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश काढले. तेव्हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सुधीरकुमार गोयल यांना प्रशासक नेमण्याचा आग्रह धरला होता. शेवटी गोयल यांच्यासह सुधीर श्रीवास्तव या दोन्ही प्रधानसचिवांना प्रशासक म्हणून नेमले. प्रमोद कर्नाड हे त्यावेळी बँकेचे एमडी होते. तिघांनी बँकेची गाडी रुळावर आणण्याचे प्रयत्न केले. १ वर्षे त्यांनी काम केले. नंतर जतींदर सहानी व व्ही.के.अग्रवाल यांना प्रशासक म्हणून नेमले गेले. पुढे भाजप सेनेचे सरकार आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील एम.एस. सुखदेवे, ए.ए. मकदूम आणि के.जी. तांबे यांना प्रशासक नेमले. आता विद्याधर अनासकर हे बँकेचे प्रशासक आहेत तर सहाय्यक समितीत अविनाश महागावकर आणि संजय भेंडे आहेत.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रCorruptionभ्रष्टाचारfraudधोकेबाजीMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणCourtन्यायालय