शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 15:25 IST

राज्यात काय वातावरण आहे, किती जागा लढायच्या, अजित पवारांना सोबत घेतले तर लोकसभेसारखा फटका बसेल का, असे अनेक प्रश्न भाजपश्रेष्ठींना सतावत आहेत.

महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. इकडे तीन विरुद्ध तिकडे तीन अशी लढत होणार की महायुती आणि मविआतील पक्ष फुटणार इथपर्यंत सारी अनिश्चितता आहे. महायुतीत अजित पवार सोबत नको असे वारे सुरु आहेत. तर मविआत जागावाटप सुरु झाले आहे. अशातच भाजपला काही केल्या महाराष्ट्राच्या जमिनीचा कस लागत नाहीय, असे संकेत मिळत आहेत. 

राज्यात काय वातावरण आहे, किती जागा लढायच्या, अजित पवारांना सोबत घेतले तर लोकसभेसारखा फटका बसेल का, असे अनेक प्रश्न भाजपश्रेष्ठींना सतावत आहेत. यामुळे महाराष्ट्रातून काय फीडबॅक येतोय, याची वारंवार भाजपाकडून चाचपणी केली जात आहे. यामुळे भाजपा अनेक नेत्यांना दिल्लीतून महाराष्ट्रात याचीच चाचपणी करण्यासाठी पाठवत आहे. महाराष्ट्रातील सरकार एवढ्या खटपटी करून पुन्हा मिळविलेले असताना भाजप कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. 

यातूनच भाजपा दुसऱ्या राज्यातील नेत्यांना, केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात पाठवत आहे. भाजपच्या वेगवेगळ्या राज्यांतील नेत्यांवर तसेच महाराष्ट्रातील नेत्यांवर विविध विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांना या जागांच्या दौऱ्यावर पाठविण्यात आले होते. या नेत्यांनी दिल्लीतील बैठकीत या चाचपणीचा अहवाल दिला आहे. 

लोकसभेला गारद झाल्यानंतर सावध झालेल्या भाजपा गेल्या काही महिन्यांपासून राज्यातून वारंवार माहिती घेत आहे. उत्तर प्रदेश, गुजरातच्या नेत्यांना पाठविले जात आहे. यानुसार भाजपा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविणार आहे. तसेच पुढील रणनिती ठरविणार आहे.

तसेच उमेदवार कोण असेल हे देखील ठरविले जाणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतच लोकसभेला मदत केलेल्या, सोबत असलेल्या छोट्या पक्षांनाही जागा द्यायच्या आहेत. यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला महायुतीत वादळ आणण्याची शक्यता असून भाजपसमोर हे एक आव्हान ठरणार आहे. 

टॅग्स :BJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार