शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
2
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
3
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
4
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
5
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
6
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
7
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
8
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
9
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
10
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
11
खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
12
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
13
ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
14
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
15
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
16
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
17
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
18
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
19
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
20
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा बाहेर जातेच कशी?, उद्धव ठाकरे यांनी दिले चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 07:08 IST

शिवसेना आमदार-खासदारांच्या ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीची माहिती बाहेर जातेच कशी, असा सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला असून माहिती बाहेर कशी गेली, याची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे समजते.

अतुल कुलकर्णी मुंबई : शिवसेना आमदार-खासदारांच्या ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीची माहिती बाहेर जातेच कशी, असा सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला असून माहिती बाहेर कशी गेली, याची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे समजते.सोमवारी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीचा वृत्तांत माध्यमांपर्यंत पोहोचल्याने उद्धव यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीत घडलेल्या प्रकाराबाबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे तीव्र नापसंती व्यक्त केली. आपला तोल गेला, कोणाला दुखवायचे नव्हते, असे सांगत बारणे यांनी उद्धव यांची माफी मागितली. उद्धव यांच्या सांगण्यावरून बारणे यांनी आ. नीलम गोºहे यांना फोन केला. त्यानुसार उभयतांचे फोनवर बोलणे झाल्यानंतर, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे संयुक्त निवेदन त्यांनी प्रसारमाध्यमांना दिले.उद्धव ठाकरे पक्षाच्या आमदारांना भेटून त्यांची गाºहाणी ऐकणार होते. पण ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.भाजपा पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू असल्याचे विधान खा. संजय राऊत यांनी केले होते. त्यावर सेनेच्या आमदारांमध्ये तीव्र पडसाद उमटले. राऊत यांना लोकांमधून निवडून यायचे नाही. आम्हाला जनतेला सामोरे जावे लागते. तेव्हा त्यांनी भान ठेवून बोलावे, असे काही आमदारांनी म्हटले आहे.आम्ही अल्टीमेटच ! - मुख्यमंत्रीशिवसेनेने दिलेल्या अल्टीमेटमवर आपली भूमिका काय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, आम्ही अल्टीमेटच आहोत, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली.