शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

चर्चा बाहेर जातेच कशी?, उद्धव ठाकरे यांनी दिले चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 07:08 IST

शिवसेना आमदार-खासदारांच्या ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीची माहिती बाहेर जातेच कशी, असा सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला असून माहिती बाहेर कशी गेली, याची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे समजते.

अतुल कुलकर्णी मुंबई : शिवसेना आमदार-खासदारांच्या ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीची माहिती बाहेर जातेच कशी, असा सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला असून माहिती बाहेर कशी गेली, याची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे समजते.सोमवारी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीचा वृत्तांत माध्यमांपर्यंत पोहोचल्याने उद्धव यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीत घडलेल्या प्रकाराबाबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे तीव्र नापसंती व्यक्त केली. आपला तोल गेला, कोणाला दुखवायचे नव्हते, असे सांगत बारणे यांनी उद्धव यांची माफी मागितली. उद्धव यांच्या सांगण्यावरून बारणे यांनी आ. नीलम गोºहे यांना फोन केला. त्यानुसार उभयतांचे फोनवर बोलणे झाल्यानंतर, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे संयुक्त निवेदन त्यांनी प्रसारमाध्यमांना दिले.उद्धव ठाकरे पक्षाच्या आमदारांना भेटून त्यांची गाºहाणी ऐकणार होते. पण ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.भाजपा पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू असल्याचे विधान खा. संजय राऊत यांनी केले होते. त्यावर सेनेच्या आमदारांमध्ये तीव्र पडसाद उमटले. राऊत यांना लोकांमधून निवडून यायचे नाही. आम्हाला जनतेला सामोरे जावे लागते. तेव्हा त्यांनी भान ठेवून बोलावे, असे काही आमदारांनी म्हटले आहे.आम्ही अल्टीमेटच ! - मुख्यमंत्रीशिवसेनेने दिलेल्या अल्टीमेटमवर आपली भूमिका काय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, आम्ही अल्टीमेटच आहोत, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली.