शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळांवरील नियुक्त्यांची आशा पुन्हा एकदा पल्लवित; भाजपाकडून नावांच्या याद्या सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 05:59 IST

शिंदेसेना, अजित पवार गटाकडूनही नावे मागविली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरच्या मध्यात लागू होण्याची शक्यता असताना आता महायुती सरकार महामंडळांवरील नियुक्त्यांच्या मागे लागले आहे. त्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते, नेत्यांचे समाधान करत त्यांना प्रचारात सक्रिय केले जाणार आहे. 

जून २०२२ मध्ये शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आले. तेव्हापासून महामंडळे, महत्त्वाच्या विविध समित्यांवरील नियुक्ती झालेल्या नाहीत. मध्यंतरी भाजप-शिंदेसेना-अजित पवार गट अशा तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचा आणि प्रमुख नेत्यांचा समावेश असलेली एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली. आ. प्रसाद लाड हे या समितीचे समन्वयक आहेत. सूत्रांनी सांगितले की, महामंडळांवरील नियुक्तीसाठी भाजपचे नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. 

तिन्ही पक्ष एकत्रित बसून घेतील अंतिम निर्णय

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार  आ. प्रसाद लाड यांनी भाजपचे प्रमुख नेते, मंत्री, विभागीय संघटकांशी चर्चा करून काही नावे काढली आहेत.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आणि एक-दोन ज्येष्ठ मंत्र्यांची लवकरच बैठक होऊन त्यात नावांना अंतिम स्वरूप दिले जाईल.

त्याचप्रमाणे शिंदे सेना आणि अजित पवार गटाकडूनही काही नावे ठरविली जात असल्याची माहिती आहे. तिन्ही पक्षांच्या याद्या तयार  झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रितपणे बसून अंतिम निर्णय घेतील. १७ ऑगस्टपर्यंत निर्णय होईल, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. 

समन्वय समितीच्या पातळीवर महामंडळांवरील नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावण्याचे बरेचदा ठरले पण याद्याच तयार झाल्या नव्हत्या. आता या कामाला गती देण्यात आली आहे. 

पद जाईल की पूर्ण कार्यकाळ मिळेल

- महायुतीतील ज्या नेत्यांना महामंडळांवर नियुक्ती मिळेल पण लगेच आचारसंहिता लागणार आहे.- विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बदलले तर या नियुक्ती औटघटकेच्या ठरतील, असा एक सूर आहे पण जाणकारांच्या मते महायुतीचे सरकार आले नाही तरी महामंडळांवर आता नियुक्त केलेले पदाधिकारी कायम राहतील.- कारण, महामंडळांच्या कायद्यात जेवढा कार्यकाळ नमूद केलेला असतो तेवढ्या कार्यकाळासाठी संबंधितास पदावर राहता येते. - सरकार बदलले तरी आधीच्या सरकारद्वारे नियुक्त नेत्यांना महामंडळांवरून काढता आले नाही, अशी उदाहरणे आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस