शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

अनाथांना मिळणार हक्काचे घर : म्हाडामध्ये १ टक्का समांतर आरक्षणास मान्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 12:26 IST

राज्यभरात १८ वर्षांवरील सुमारे ४ हजारहून अधिक मुले-मुली आहेत. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

ठळक मुद्देम्हाडाच्या गृहनिर्माण योजनेत अनाथांना घरे मिळावीत यासाठी जानेवारी २०१९ मध्ये ठराव मंजूर ‘लोकमत’ने प्रथम या प्रश्नाला फोडली होती वाचा

- श्रीकिशन काळे पुणे : म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेमध्ये अनाथांना आरक्षण मिळण्यासाठी अनेक वर्षांपासूनची लढाई सुरू होती. त्याला आता यश आले असून,सरकारने अनाथ व्यक्तींना खुल्या प्रवर्गातून १ टक्का समांतर आरक्षण देण्यास मान्यता दिली आहे. राज्यभरात १८ वर्षांवरील सुमारे ४ हजारहून अधिक मुले-मुली आहेत. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. ‘लोकमत’ने प्रथम या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यानंतर सातत्याने याचा पाठपुरावा केला होता. म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेत अनाथांना घरे मिळावीत, यासाठी जानेवारी २०१९ मध्ये ठराव मंजूर केला होता. त्यानंतर सरकारकडे तो मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या आरक्षणाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. याबाबत अनाथांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते अभय तेली म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासूनची आमची ही मागणी होती. कारण अनाथ व्यक्तींना आसरा मिळत नाही. अठरा वर्षांपर्यंत शासनाचा आधार मिळतो. परंतु, त्यानंतर अनाथांना समाजात एकटेच जगावे लागते. तेव्हा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कोणतेही कागदपत्र हातात नसतात. त्यामुळे अनाथ व्यक्ती खूप निराश होऊन जाते. म्हणूनच त्यांना घराची अत्यंत आवश्यकता असते. या आरक्षणामुळे आता हक्काचे घर मिळणार आहे.’’ अनाथांच्या या आरक्षणासाठी आमदार बच्च कडू यांनी सातत्याने विधानसभेत प्रश्न मांडले होते. तसेच आंदोलने केली होती. दरम्यान, सिडको मध्येही १ टक्का आरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे. 

अनाथांना दिलेले आरक्षण हे शिक्षण, नोकरी किंवा शिष्यवृत्तीपुरते न ठेवता अपंगाप्रमाणे सर्व विभागामध्ये दिले पाहिजे. तसेच अनाथांना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करावे. तरच त्यांना पुढील आयुष्य चांगल्या प्रकारणे जगता येईल. - अभय तेली, स्वनाथ सामाजिक संस्था 

अनाथांना म्हाडाच्या योजनेत १ टक्का आरक्षण हा योग्य निर्णय आहे. पण आता १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींना पुढील शिक्षण घेण्यासाठी अनुरक्षणगृह असले पाहिजे. कारण १८ वर्षानंतर बालगृहातून बाहेर पडल्यावर त्यांना कुठे जायचे ? असा प्रश्न पडतो. त्यामुळे किमान पायावर उभे राहता येईल, तोपर्यंत शासनाने मदत करणे आवश्यक आहे. - सुलक्षणा आहेर, सामाजिक कार्यकर्ती 

‘लोकमत’ने फोडली वाचा ‘अनाथांना घर मिळेल का घर?’ असे वृत्त देऊन ‘लोकमत’ने प्रथम या अनाथांच्या मागणीला वाचा फोडली होती. त्यानंतर अनाथांची राज्यस्तरीय संघटना स्थापन झाली आणि त्याद्वारे या मागणीचे निवेदन सरकारला दिले होते. 

टॅग्स :Puneपुणेmhadaम्हाडाGovernmentसरकारHomeघर