शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

"सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी..."; राज ठाकरेंच्या सभेआधी गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 12:41 IST

Dilip Walse Patil And MNS Raj Thackeray : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांच्या सभेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची तोफ आज 1 मे रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर धडाडणार आहे. 'मशिदीवरील भोंगा हटाव' मोहीम हाती घेतल्यानंतर राज ठाकरे यांची सभा होत असल्याने व्यासपीठ कसे असणार याची सर्वांना उत्सुकता होती. यातच राज ठाकरे यांच्या सभेच्या व्यासपीठामागे भगव्या पडद्यावर राजमुद्रा आणि रेल्वे इंजिन दिसत आहेत. तसेच शहरात आणि सभास्थळी लावलेल्या भगव्या झेंड्यांवर देखील रेल्वे इंजिन दिसल्याने चर्चा सुरू झाली आहे. याच दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी राज ठाकरे यांच्या सभेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

गृहमंत्र्यांना राजकीय सभा आणि सुव्यवस्था यावरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला त्यांनी उत्तर दिलं आहे. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, अशी विनंती केली आहे. "राजकीय सभा आणि राजकीय कार्यक्रम लोकशाहीत सुरूच असतात. कायदा आणि सुव्यवस्था तसेच राज्यात शांतता ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असते. यादृष्टीने संपूर्ण पोलीस विभाग तयारी करत आहे. ते सज्ज आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, अशी अपेक्षा आहे. अशा काही घटना घडल्यास त्याला सामोरं जाण्यासही पोलीस तयार आहेत. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, अशी विनंती आहे" असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीनंतर राज्यात दंगली होतील का? असे याआधी गृहमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात दंगली होतील असे काही वातावरण नाही. मात्र पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. देशात काही राज्यात दंगे झाले आहेत. महाराष्ट्रातही तसे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. पण, महाराष्ट्रात पोलीस तयारीत आहेत. जे कुणी असा प्रयत्न करत असतील त्यांना जशास तसे उत्तर देऊ. देशासमोर महागाई, सीमा सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अशी अशांतता काही घटक निर्माण करत आहेत. हे घटक कोण आहे ते पोलीस तपासात समोर येईल असंही त्यांनी सांगितलं होतं.  

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलRaj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण