शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

हिटलरनं राजीनामा न देता आत्महत्या केली होती; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 12:08 IST

कोविड असेल वा अन्य कुठल्याही घोटाळ्याचा आरोप केला जातो, त्याचे टेंडर ज्यांनी काढले ते सगळेच शिंदे गटासोबत आहेत असा दावा राऊतांनी केला.

नवी दिल्ली - Sanjay Raut on Eknath Shinde ( Marathi News ) कोडगे लोक राजीनामा देत नाही. हिटलरनेही सु्द्धा राजीनामा दिला नाही तर त्याने आत्महत्या केली. जगभरातही ज्या लोकांनी बेकायदेशीर राज्य केले त्यांना हुसकावून बाहेर काढले आहे किंवा ते पळून गेले आहे हा इतिहास सांगतो, माझे कुणावरही व्यक्तिगत मत नाही. एकनाथ शिंदेंसारखे खोटारडे राज्यकर्ते महाराष्ट्रावर राज्य करतायेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. 

संजय राऊत म्हणाले की, भाजपाने लिहून दिलेले भाषण वाचणे यापलीकडे त्यांच्याकडे काय काम राहिले नाही. कोविड घोटाळ्याचा विषय काढायचा असेल तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोविड काळात केलेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याची चौकशी करावी असं पत्र शिंदे गटातील आमदाराने लिहिलं आहे. ते पत्र माझ्याकडे आहे. माझे संबंधितांशी बोलणे झाले आहे. त्या २७०० कोटींच्या घोटाळ्याचे धागेदोरे गुलाबराव पाटील यांच्याकडे पोहचतात. चिमणआबा पाटील या शिंदेंना दिलेल्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची भूमिका काय? भ्रष्टाचाराने तुमची मांडी चेपली आहे. त्यामुळे चिमणआबा पाटील यांनी केलेल्या कोविड काळातील घोटाळ्याची चौकशी करा. त्यानंतर मुंबई महापालिकेत कोविड काळात काय घडले, कुणामुळे घडले जे आज तुमच्यासोबत बसले आहेत त्यांच्याबद्दल पुराव्यानिशी माहिती देऊ असा इशारा त्यांनी दिला. 

त्याचसोबत ज्यांनी मुंबई महापालिकेत सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली ते आमदार आणि तेव्हाचे स्थायी समिती अध्यक्ष भाषणावेळी त्यांच्या मागेच बसले होते. कोविड असेल वा अन्य कुठल्याही घोटाळ्याचा आरोप केला जातो, त्याचे टेंडर ज्यांनी काढले ते सगळेच शिंदे गटासोबत आहेत. नाव घ्यायची असेल तर आता नाव घेईन. सगळे टेंडरबाज लोक राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबासोबत सहभागी आहेत. आपण कुणाविषयी आणि काय बोलतोय याचे भान मुख्यमंत्र्यांना असायला हवे असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. 

१४३ खासदारांनी लोकशाहीसाठी बलिदान दिलं

आमचा लढा व्यक्तीविरोधात नाही, देशाचे संविधान वाचवण्यासाठी लढा आहे. देशातील लोकशाही, कायदा, संसद,संसदीय लोकशाही, घटनात्मक संस्था यांचे रक्षण करण्यासाठी १४३ खासदारांनी स्वत:चे बलिदान दिले आहे हे विसरू नका. जे लोक एका व्यक्तीच्या रक्षणासाठी उभे आहेत. त्यांनी स्वत:चा अंतरआत्मा तपासून पाहावा. या देशात सध्या जे चाललंय ते त्यांना मान्य आहे का असा सवाल संजय राऊतांनी भाजपा नेत्यांना विचारला.संजय राऊत म्हणाले की, याच लोकांचे पूर्वज म्हणजे पूर्वीचे नेते त्यांनी आणीबाणीविरोधात का लढा दिला होता हे त्यांनी समजून घ्यावे. १४३ खासदारांची ज्यापद्धतीने मुंडकी उडवली आहेत का यावर भाष्य करावे.लोकशाहीच्या मंदिराचे स्मशान केले आहे. लोकशाहीचे रक्षणकर्ते त्यांचे बलिदान ज्यांनी दिले हे पाहता लोकशाहीचे मंदिर पायदळी तुडवले त्यांना राम मंदिराचा सोहळा करून राजकारण करण्याचा अधिकार नाही हे आमचे स्पष्ट मत आहे असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, प्रभू श्री राम देशाचे राजे होते, लोकशाही राज्य होते. त्याची लढाई रावणासोबत होती. शत्रूचा आदर करावा ही रामनिती आहे. सध्या रामभक्तांना हा विचार मान्य आहे का? लोकशाहीच्या मंदिरात तुम्ही हत्याकांड करायचे, हौताम्य द्यायचे आणि दुसरीकडे राम मंदिराच्या भजनात सामील व्हायचे यासारखा देशाचा अपमान दुसरा काहीच नाही. तसेच ज्यांनी राम मंदिरासाठी त्याग केला, त्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, आम्ही, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले जाणार नाही. ज्यांचे योगदान नाही त्यांचा हा सोहळा आहे अशी टीका राऊतांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा