शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
2
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
4
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
5
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
6
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
7
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
8
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
9
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
10
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
11
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
12
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
13
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
14
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
15
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
16
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
17
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
18
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
19
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
20
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा

"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 21:21 IST

"आपण वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध जरूर केला. का केला? कारण त्या वक्फ बिलाचा आणि आपल्या हिंदूंचा काडीचाही संबंध नाही..."

भारतीय जनता पक्ष. परवा हनुमान जयंती झाली, त्याआधी रामनवमी झाली. किती हिंदूंच्या घरात त्यांनी भेटी दिल्या? एका तरी हिंदूच्या घरी आले? पण यावेळी प्रथम देशातील ३२ लाख मुस्लीम कुटुंबियांना 'सौगाते मोदी'. त्यांच्याकडे पैसा बक्कळ आहे. म्हणजे भाजपने जो काही पैसा ओरबाडला, त्या पैशांतून मुस्लिमांच्या घरात 'सौगात' वाटतायत. म्हणजे, हिंदूंना दिली घंटा, यांना देतायत सौगात. आनंद आहे. पण हे कधी? हे मुस्लीम आम्ही केलेल्या कामामुळे माझ्यासोबत आले, म्हणून तुम्हाला हे सर्व सुचत आहे. त्यापूर्वी काय करत होता? "बटेंगे तो कटेंगे". म्हणजे, महाराष्ट्रातल्या निवडणुकीत 'बटेंग तो कटेंगे' आणि बिहारमध्ये "बाटेंगे और जितेंगे". म्हणजे, भेटी वाटणार आणि मग जिंकणार. आता हिंदू-मुस्लीम, सगळ्या धर्मांनी सावध रहायला हवे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर हल्ला चढवला. ते नाशिक येथे पक्षाच्या निर्धार शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.

ठाकरे म्हणाले, "त्यांनी (भाजप) एक अपप्रचार केला की, शिवसेनेने हिंदुत्व सोडले, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले. अरे, मुस्लीम समाज आमच्यासोबत आला, का आला? कारण कोरोना काळात मी कधी जातीय भेदभाव केला नाही आणि मुख्यमंत्री असतानाही मी मुख्यमंत्री पदाच्या प्रतिष्ठेला डाग लागू दिला नाही. सर्वांना समानतेने वागवले. आज भारतीय जनता पक्ष जे काही करत आहे, सांगा मला, कोणी हिंदुत्व सोडले? मी सोडले की, भाजपने सोडले?  आपण वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध जरूर केला. का केला? कारण त्या वक्फ बिलाचा आणि आपल्या हिंदूंचा काडीचाही संबंध नाही."

ठाकरे पुढे म्हणाले, "संपूर्ण दोन दिवसांतील त्यांची संसदेतील भाषणे तुम्ही ऐकलीत..., मला असे वाटते की, तोही एक कार्यक्रम करा की, त्या कार्यक्रमात अमित शहापासून ते सर्वांनी केलेली भाषणे ऐकवा. अमित शहा, राजनाथ सिंह, किरण रिजिजू, पियुष गोयल बसले होते आणि त्यांच्यासमोर नितीश कुमार यांचे खासदार ललन सिंह आणि तेलुगु देशमचे नेते जोरात सांगत होते, 'मुसलमानांच्या हिताचे रक्षण जनता दल (यु) करेल, टीडीपी करेल आणि हे लाचारीने खाली मान घालून हसत होते. कारण सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही जो सत्ता-जिहाद केला, कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेला दूर केले आणि मशिदीत जाणाऱ्या चंद्रबाबूंना तुम्ही सोबत घेतले आणि आम्हाला सांगता, आम्ही हिंदुत्व सोडले?" असा सवालही यावेळी ठाकरे यांनी भाजपला केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाwaqf board amendment billवक्फ बोर्ड