शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

आघाडीच्या 41 व्या जागेचा तिढा सुटला; यवतमाळ काँग्रेसच्या पारड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 20:31 IST

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आघाडी करण्यावरून बोलणी 40 जागांवर थांबली असताना उर्वरित जागांचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसेने कंबर कसली आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आघाडी करण्यावरून बोलणी 40 जागांवर थांबली असताना उर्वरित जागांचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसेने कंबर कसली आहे. याच पार्श्वभुमीवर आज सायंकाळी काँग्रेसचे अध्य़क्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली. यामध्ये यवतमाळ मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला असून आता 7 जागांवर चर्चा होणार आहे. 

 

महाराष्ट्रात युतीचे गुऱ्हाळ अद्याप सुरुच असून काँग्रेस आणि राष्टवादीने यामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आघाडीसाठी 40 जागांच्या वाटपावर शिक्कामोर्तब झाले असून उर्वरित आठ जागांसाठी मित्रपक्षांनी किती आणि कोणत्या जागा लढवायच्या यावर चर्चा करण्यासाठी आज सायंकाळी नवी दिल्लीतील शरद पवार यांच्या घरी राहुल गांधी यांनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मर्लिकार्जुन खरगे हे देखिल उपस्थित होते. 

ही बैठक संपली असून या बैठकीमध्ये आघाडीच्या जागावाटपावर चर्चा झाली. यामध्ये यवतमाळसाठी काँग्रेसला झुकते माप देण्यात आले. 

 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा अनुकूल असून ज्या ४० जागांविषयी वाद नाही, त्या प्रत्येकी २० जागा असे वाटप झाले आहे. उर्वरित ८ जागांबाबत चर्चा सुरू असून त्यापैकी काही जागा मित्र पक्षांसाठी सोडायच्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. पुणे व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नसून राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस