शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

‘टिंगलटवाळी सोडून शेतकऱ्यांना मदत करा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 08:25 IST

फडणवीस बुधवारी मराठवाडा दौऱ्यावर आले होते. परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.

परभणी/जालना : अतिवृष्टीने शेती व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना सरकारकडून कोणतीही मदत नाही, पंचनामे होत नाहीत. मीडियासमोर टिंगलटवाली करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करण्यावर लक्ष द्यावे, अशा भाषेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला फटकारले.फडणवीस बुधवारी मराठवाडा दौऱ्यावर आले होते. परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर व्यथा मांडल्या. यावेळी ते म्हणाले की, पालकमंत्रीही वसमत तालुक्यात आले नाहीत, सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गांभीर्यच नाही. बोलणारेच जास्त झालेत, निर्णय घेणारे कोणी राहिले नाहीत. असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्यासमवेत माजी मंत्री पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, आ. मेघना बोर्डीकर आदींची उपस्थिती होती. मराठवाड्यात शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला असून, बांधावर पाहणी करण्याची ही वेळ नाही. तेव्हा शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस झाले भावनिकफडणवीस सिंधी काळेगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना एका शेतकऱ्याने हातात मूग आणि सोयाबीन आणले. त्या पिकांची स्थिती पाहून फडणवीस भावनिक झाले. परंतु लगेच सावरत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. तातडीने मदत देण्यास राज्य सरकारला भाग पाडू असे आश्वासन त्यांनी दिले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीBJPभाजपाShiv Senaशिवसेना