शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

‘टिंगलटवाळी सोडून शेतकऱ्यांना मदत करा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 08:25 IST

फडणवीस बुधवारी मराठवाडा दौऱ्यावर आले होते. परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.

परभणी/जालना : अतिवृष्टीने शेती व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना सरकारकडून कोणतीही मदत नाही, पंचनामे होत नाहीत. मीडियासमोर टिंगलटवाली करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करण्यावर लक्ष द्यावे, अशा भाषेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला फटकारले.फडणवीस बुधवारी मराठवाडा दौऱ्यावर आले होते. परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर व्यथा मांडल्या. यावेळी ते म्हणाले की, पालकमंत्रीही वसमत तालुक्यात आले नाहीत, सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गांभीर्यच नाही. बोलणारेच जास्त झालेत, निर्णय घेणारे कोणी राहिले नाहीत. असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्यासमवेत माजी मंत्री पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, आ. मेघना बोर्डीकर आदींची उपस्थिती होती. मराठवाड्यात शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला असून, बांधावर पाहणी करण्याची ही वेळ नाही. तेव्हा शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस झाले भावनिकफडणवीस सिंधी काळेगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना एका शेतकऱ्याने हातात मूग आणि सोयाबीन आणले. त्या पिकांची स्थिती पाहून फडणवीस भावनिक झाले. परंतु लगेच सावरत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. तातडीने मदत देण्यास राज्य सरकारला भाग पाडू असे आश्वासन त्यांनी दिले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीBJPभाजपाShiv Senaशिवसेना