शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 05:45 IST

दरड कोसळली, पूल वाहून गेला, दोघेजण बुडाले.

ठळक मुद्देदरड कोसळली, पूल वाहून गेला, दोघेजण बुडाले.

रायगड : जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा सुरूच आहे. मुंबई-पुणे महामार्गावर काजूवाडीजवळ, श्रीवर्धन-नानवली आणि मुरुड-सावली या ठिकाणी दरडी काेसळल्याने वाहतूक ठप्प हाेती, तसेच मुरुड-विहूर परिसरातील पुलाची एक बाजू वाहून गेली आहे. माेहपाडा येथे दाेघांचा बुडून मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर अतिवृष्टीने पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली आहे, तर १४ जुलैपर्यंत पावसाचा तडाखा कायम राहणार असल्याने, प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीमुळे श्रीवर्धन-नानवली रस्त्यावर आज दरड कोसळली. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दरड हटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

१२ जुलैच्या रात्री मुंबई-पुणे महामार्गावरील काजूवाडी परिसरात दरड कोसळली होती. युद्धपातळीवर काम करून रात्रीच दरड हटविण्यात आली आहे. मुरुड तालुक्यातील सावली टोकेखार या ठिकाणी दरड काेसळल्याने वाहतूक बंद होती. दरड हटविण्याचे काम सुरू आहे. मुरुड तालुक्यातील विहूर येथील पुलाची एक बाजू अतिवृष्टीने वाहून गेली आहे. त्यामुळे दोन्हीकडील गावांचा संपर्क तुटला आहे. १२ जुलै रोजी मोहपाडा येथील पलस धरणात बुडून सागर अंबरे (२२) याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह दोन तासांनी मिळाला, तसेच मोहपाडा तलावातही राकेशकुमार (१९) हा युवकही १२ जुलै रोजी बुडाला होता. त्याचा मृतदेह मंगळवारी तब्बल २४ तासांनी मिळाला. महाड तालुक्यातील म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर रावढळ-तुडील पुलावरून अतिवृष्टीने पाणी जात असल्याने तो वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे, तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

मुंबईत पावसाची जोर‘धार’; ऑरेंज अलर्ट कायममुंबई : मुंबईसह कोकणाला हवामान खात्याने दिलेला ऑरेंज अलर्ट कायम असून, १४ जुलै रोजी कोकणात बहुतांशी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. शिवाय किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. सोमवारी कोसळलेल्या पावसानंतर मंगळवारी सकाळीदेखील मुंबईत पावसाचा मारा कायम होता. 

सौराष्ट्र किनारीपट्टी ते पश्चिम - मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत (दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओरिसा) कमी दाबाचा पट्टा असून, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत तीन ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. ११ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. २२ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. सकाळी कोसळलेल्या पावसाने दुपारी मात्र विश्रांती घेतली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागली होती.

१४ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भातदेखील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. १५ जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात असेच हवामान कायम राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

११ कामगार किरकोळ जखमीसोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मार्वे मालाड येथील आयएनएस हमला, नेव्ही मेन गेट येथे तात्पुरत्या सेटचा भाग कोसळला. या दुर्घटनेत ११ कामगार किरकोळ जखमी झाले. त्यापैकी दहा जणांना आयएनएस हमला येथे उपचार करून सोडण्यात आले. एका जखमी कामगाराची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रRaigadरायगडMumbaiमुंबईweatherहवामान