शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
2
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
3
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
4
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
5
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
6
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
7
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
8
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
9
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
10
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
11
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
12
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
13
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
14
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
15
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
16
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
17
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
18
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
19
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
20
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 06:44 IST

नदी-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने पूरस्थिती, नांदेडमध्ये बचावकार्यासाठी सैन्य दलाची मदत; नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे राज्य सरकारचे आदेश; मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील अतिवृष्टीचा आढावा, २१ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा  फटका शेतकऱ्यांना बसला असून  जवळपास चार लाख हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात  २१ ऑगस्टपर्यंत पुन्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली असून १५ ते १६  जिल्ह्यात रेड अलर्ट तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सोमवारी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त आणि  जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाइन संपर्क साधला, यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. 

नांदेड विभागात २०६ मिमी इतका ढगफुटीसदृश पाऊस  झाला असून तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफसह आता सैन्यदलाला देखील पाचारण केले आहे. मुंबईत सोमवारी सकाळी ६ नंतरच्या सहा तासात १७० मिमी पाऊस झाला. मुंबईत मंगळवारी चार मीटरपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. ज्या भागात रेड अलर्ट आहे, तेथील नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.मुंबईत पावसाच्या तडाख्याने लोकल उशिराने धावत होत्या. मेट्रो सेवा मात्र सुरळीत होती. मुंबईकरांना भविष्यात मेट्रोच्या रूपाने सुकर प्रवास मिळेल, हे यातून दिसल्याचे फडणवीस म्हणाले.

पावसाचा मंडे ‘ब्लॉक’

मुंबई : रेल्वेसह रस्ते वाहतुकीला ब्रेक लावणाऱ्या पावसाने मुंबईचे जनजीवन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विस्कळीत केले. पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गासह मध्य आणि हार्बरवर साचलेल्या पाण्यामुळे रस्ते, लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला. लोकल पाऊण तास उशिराने धावत असल्याने चाकरमानी स्टेशनावर अडकून पडले.

पालघरमध्ये नद्या फुगल्या

पालघर : गेल्या चार दिवसांपासून अर्थात शुक्रवार सकाळपासून जिल्ह्यात वसई-विरार वगळता उर्वरित ठिकाणी रिपरिप सुरू असणारा पाऊस सोमवार सकाळपासून सर्वत्र दमदार सुरू झाला. अनेक धरणांच्या साठ्यात वाढ झाली असून नद्या ही धोका पातळी जवळ पोहोचल्या आहेत.

नुकसान भरपाईचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

  • घरांचे नुकसान, माणसे, पशुधनाचे मृत्यू याबाबत झालेल्या नुकसानीच्या भरपाईचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यासाठीचा निधीही उपलब्ध करून  देण्यात आला आहे.
  • घरांचे नुकसान झालेल्यांना तात्पुरते निवारे उभारण्याचे, तसेच तेथील लोकांना जेवण आणि पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याचे आदेश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
  • मराठवाड्यातील बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे. पुढचे तीन दिवस बीड, लातूर, नांदेडमध्ये पूरस्थितीची शक्यता आहे. मुखेड भागात २०६ मिमी पाऊस झाला असून  पाच लोक बेपत्ता आहेत.
  • तसेच १५० पेक्षा  जास्त जनावरे मृत अथवा वाहून गेली आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागामधील तीन  जिल्ह्यांचा विचार केला तर ८०० गावे बाधित असून एक लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
  • कोकणात जगबुडी, अंबा, कुंडलिका या नद्या इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. वशिष्ठीमुळे चिपळूणमध्ये पूर असल्याने त्यावरही लक्ष आहे. कोल्हापूर, सातारा घाट विभागात रेड अलर्ट आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
  • मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट भागात मंगळवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 
टॅग्स :Rainपाऊस