शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात वीक एन्ड होणार चिंब-चिंब, मुसळधार पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 12:17 IST

राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे येता वीक एन्ड मुसळधार पावसात चिंब न्हाऊन निघण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देराज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.येत्या शुक्रवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पावसाचं फेरआगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहेऐन पावसाळ्यात पीकं करपल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्याला या पावसाने पुन्हा दिलासा मिळणार आहे.येता वीक एन्ड मुसळधार पावसात चिंब न्हाऊन निघण्याची चिन्हे आहेत.

मुंबई, दि. 16- राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या शुक्रवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पावसाचं पुन्हा आगमन होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी येता वीक एन्ड मस्त पावसात चिंब न्हाऊन निघण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढच्या 24 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वेधशाळेच्या अंदाजानुसार खरंच नभ उतरू आले, तर शेतक-यांच्या डोईवरलं चिंतेचं मळभही काही प्रमाणात दूर होईल.  त्यामुळे ऐन पावसाळ्यात पीकं करपल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्याला या पावसाने पुन्हा दिलासा मिळणार आहे. 

मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही हेच चित्र पाहायला मिळतं आहे. ऐन मौसमात पावसाने अचानक दांडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकही चिंतेत आहेत. त्यामुळे मोठ्या विश्रांतीनंतर येणाऱ्या या पावसाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. 

आणखी बातम्या वाचा

तलावांमध्ये ३४८ दिवसांचा साठा

अखेर विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच

सर्वांगसुंदर मुंबईसाठी कटिबद्ध - महापौर

पेरणीनंतर अचानक गायब झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. लातूरच्या औसा तालुक्यात 2 भावांनी साडे सहा एकरात सोयाबीन पेरलं, पण पावसाने दडी मारल्यानं 2 लाख खर्चून पेरलेल्य़ा सोयाबीनचं नुकसान झालं. त्यामुळे पेरणीचं नुकसान होऊ नये,यासाठी शेतकऱ्याचं पावसाकडे लक्ष लागलं आहे.

एकीकडे महाराष्ट्रात पावसाने दडी मारलेली असताना दुसरीकडे बिहारमध्ये पावसाचं थैमान बघायला मिळतं आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहार आणि नेपाळच्या सीमेलगतच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यातच नेपाळकडून धरणांमधील पाणी सोडण्यात येत असल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची पथकं मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. तसंच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारकडून लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.बिहारमधील पुरस्थितीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढता असून, या महापुरामुळे आत्तापर्यंत 56 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राप्त आकडेवारीनुसार अररिया येथे 20, किशनगंजमध्ये 8, पूर्व चंपारण्य जिल्ह्यात 3, पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात 9, दरभंगा जिल्ह्यात 3, मधुबनी जिल्ह्यात 3 सीतामढी येथे 5, माधेपुरा येथे 4 आणि शिवहर येथे एकाचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी