शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

जोर'धार' पाऊस ! रायगडमधील कुंडलिका आणि अंबा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 20:21 IST

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी पहाटे कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांनी धोकादायक पूर जलपातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदी किनारवरील 19 गावांना तर अंबा नदी किनारच्या 9  गावांना पूर आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे.

जयंत धुळप/रायगड, दि. 29 - गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी पहाटे कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांनी धोकादायक पूर जलपातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदी किनारवरील 19 गावांना तर अंबा नदी किनारच्या 9  गावांना पूर आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व गावांमध्ये संबधीत धोक्याचा इशारा देऊन ग्रामस्थांना सतर्क करण्यात आले आहे. शिवाय, आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

सावित्री नदी किनारवरील 43 गावांमध्येही सतर्कतेचा इशारादरम्यान महाबळेश्वर येथे सोमवारी (28 ऑगस्ट) रात्री झालेला पाऊस आणि पोलादपूर व महाड तालुक्यांत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे यामुळे सावित्री नदीच्या जलपातळीतदेखील झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी सावित्री नदी किनारच्या 43 गावांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाटबंधारे विभागाचा जिल्हा प्रशासनास तातडीचा संदेशकुंडलिका नदीची धोक्याची पातळी २३.९५ मीटर आहे व सद्यस्थितीत जलपातळी डोलवहाळ येथे २३.४० मीटर झाली तर अंबा नदीची धोक्याची जलपातळी नागोठणे येथे ९ मीटर आहे तर सद्यस्थितीत ही पातळी ८.२० मीटर झाली आहे. कोणत्याही क्षणी या दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी किनारच्या गावांमध्ये घुसू शकत असल्याने,  किनारवरील गावे, वस्त्या व वाड्यांना धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी आपत्ती निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी, असा संदेश रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड कार्यालयातील पूर नियंत्रण अधिकाऱ्यांनी मंगळवारी पहाटे रायगड जिल्हा प्रशासनास पाठवून कळवले आहे.

समुद्र भरतीमुळे नदी जलपातळी खाली येण्यास किमान 4 तास लागणारसकाळी 11 वाजता समुद्राला पूर्ण भरती असल्याने तसेच पाऊस सतत सुरु असल्याने नद्यांचे पाणी समुद्रात पोहोचून पूर पातळी खाली येण्यास किमान चार तास लागणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

पेणमध्ये 24 तासांत २६० मिमी विक्रमी पाऊसजिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच असून 24 तासांत जिल्ह्यात सर्वाधिक आणि विक्रमी अशा २६० मिमी पावसाची नोंद पेण येथे तर २१३ मिमी पावसाची नोंद म्हसळा येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी अलिबाग येथे १५५, मुरुड-१२७, पनवेल-१२४, उरण-१७१,  माणगांव-१०७, तळा-१५५, महाड-११३.५०, पोलादपूर-१२३, श्रीवर्धन-१००,माथेरान-१३८ ,कर्जत-७५.८०, खालापूर-७८,  रोहा-१४२, पाली-सुधागड-८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचे  सरासरी पर्जन्यमान या 24 तासात १३५.४२ मिमी होते.

भिरा धरण क्षेत्रात 183 मिमी पाऊसरायगड जिल्ह्यातील भिरा धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 183 मिमी पावसाची नोंद झाली असून, धरणातील जलपातळी नियंत्रणात राखण्याकरीता धरणाच्या तीन दरवाजांपैकी क्र.1 व 3 असे दोन दरवाजे 0.25 सेमी उघडण्यात आले आहेत. परिणामी आता पर्यंत 62.400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झाला असल्याची माहिती रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. भिरा धरण क्षेत्रांत 1 जून 2017 पासून एकूण 4454.20 मिमी पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी धरणातील जलपातळी 95.12 झाली आहे.  

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार