शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
4
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
5
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
6
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
7
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
8
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
9
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
10
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
11
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
12
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
13
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
14
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
15
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
16
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
17
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
18
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
19
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
20
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
Daily Top 2Weekly Top 5

जोर'धार' पाऊस ! रायगडमधील कुंडलिका आणि अंबा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 20:21 IST

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी पहाटे कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांनी धोकादायक पूर जलपातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदी किनारवरील 19 गावांना तर अंबा नदी किनारच्या 9  गावांना पूर आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे.

जयंत धुळप/रायगड, दि. 29 - गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी पहाटे कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांनी धोकादायक पूर जलपातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदी किनारवरील 19 गावांना तर अंबा नदी किनारच्या 9  गावांना पूर आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व गावांमध्ये संबधीत धोक्याचा इशारा देऊन ग्रामस्थांना सतर्क करण्यात आले आहे. शिवाय, आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

सावित्री नदी किनारवरील 43 गावांमध्येही सतर्कतेचा इशारादरम्यान महाबळेश्वर येथे सोमवारी (28 ऑगस्ट) रात्री झालेला पाऊस आणि पोलादपूर व महाड तालुक्यांत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे यामुळे सावित्री नदीच्या जलपातळीतदेखील झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी सावित्री नदी किनारच्या 43 गावांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाटबंधारे विभागाचा जिल्हा प्रशासनास तातडीचा संदेशकुंडलिका नदीची धोक्याची पातळी २३.९५ मीटर आहे व सद्यस्थितीत जलपातळी डोलवहाळ येथे २३.४० मीटर झाली तर अंबा नदीची धोक्याची जलपातळी नागोठणे येथे ९ मीटर आहे तर सद्यस्थितीत ही पातळी ८.२० मीटर झाली आहे. कोणत्याही क्षणी या दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी किनारच्या गावांमध्ये घुसू शकत असल्याने,  किनारवरील गावे, वस्त्या व वाड्यांना धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी आपत्ती निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी, असा संदेश रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड कार्यालयातील पूर नियंत्रण अधिकाऱ्यांनी मंगळवारी पहाटे रायगड जिल्हा प्रशासनास पाठवून कळवले आहे.

समुद्र भरतीमुळे नदी जलपातळी खाली येण्यास किमान 4 तास लागणारसकाळी 11 वाजता समुद्राला पूर्ण भरती असल्याने तसेच पाऊस सतत सुरु असल्याने नद्यांचे पाणी समुद्रात पोहोचून पूर पातळी खाली येण्यास किमान चार तास लागणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

पेणमध्ये 24 तासांत २६० मिमी विक्रमी पाऊसजिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच असून 24 तासांत जिल्ह्यात सर्वाधिक आणि विक्रमी अशा २६० मिमी पावसाची नोंद पेण येथे तर २१३ मिमी पावसाची नोंद म्हसळा येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी अलिबाग येथे १५५, मुरुड-१२७, पनवेल-१२४, उरण-१७१,  माणगांव-१०७, तळा-१५५, महाड-११३.५०, पोलादपूर-१२३, श्रीवर्धन-१००,माथेरान-१३८ ,कर्जत-७५.८०, खालापूर-७८,  रोहा-१४२, पाली-सुधागड-८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचे  सरासरी पर्जन्यमान या 24 तासात १३५.४२ मिमी होते.

भिरा धरण क्षेत्रात 183 मिमी पाऊसरायगड जिल्ह्यातील भिरा धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 183 मिमी पावसाची नोंद झाली असून, धरणातील जलपातळी नियंत्रणात राखण्याकरीता धरणाच्या तीन दरवाजांपैकी क्र.1 व 3 असे दोन दरवाजे 0.25 सेमी उघडण्यात आले आहेत. परिणामी आता पर्यंत 62.400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झाला असल्याची माहिती रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. भिरा धरण क्षेत्रांत 1 जून 2017 पासून एकूण 4454.20 मिमी पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी धरणातील जलपातळी 95.12 झाली आहे.  

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार