शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

कोकणात दमदार, जनजीवन विस्कळीत, मुंबई-गोवा महामार्ग काही काळ ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 05:43 IST

कोकणात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी पावसाचा जोर होता. पावसाने सिंधुदुर्गातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.

मुंबई/पुणे  -  कोकणात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी पावसाचा जोर होता. पावसाने सिंधुदुर्गातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.पुढील २४ तासांत दक्षिण कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून, उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर झाडांची पडझड झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. कणकवली बाजारपेठेतील दुकानांत गटाराचे पाणी घुसले. त्यामुळे व्यापाºयांचे नुकसान झाले.रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने मार्ग बंद झाले आहेत. राजापूर शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा, चिपळूण तालुक्यातील कापसाळ, खेड तालुक्यातील लोटेमाळ येथे वाहतूक ठप्प झाली होती.मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत होते. बीड जिल्ह्यात नेकनूर मंडळात दोन तर पाली मंडळात दीड इंच पाऊस झाला. अंबाजोगाई, गेवराई, वडवणी, केज येथेही पावसाची नोंद झाली. परभणीतही पाऊस झाला.रेणापूर (जि. लातूर) तालुक्यात शनिवारी दुपारी रेणा नदीला जोडणाºया ओढ्याला पूर आल्याने त्यात बाळासाहेब पांडुरंग पवार हे वाहून गेले होते़ त्यांचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला.मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून पुढील काहीदिवस अतिवृष्टी कायम राहणार आहे.

कोल्हापुरला दमदारकोल्हापूर जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाचा सकाळी जोर कायम होता. दिवसभर पावसाची भुरभुर सुरूच होती. विदर्भाच्या वेशीवर!मान्सून विदर्भाच्या वेशीवर पोहोचला असून यवतमाळ व ब्रह्मपुरी येथे पाऊस झाला. मान्सून एक-दोन दिवसांत संपूर्ण विदर्भ व्यापेल. विदर्भातील भंडारा, कुही, नागपूर, रामटेक व सेलू येथे हलकासा पाऊस झाला.

टॅग्स :RainपाऊसkonkanकोकणMaharashtraमहाराष्ट्र