शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अवघे कोकण पाण्याखाली! ठाणे, रायगड, पालघरमध्ये पूरस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 06:33 IST

उपराजधानी नागपूरसह विदर्भात शुक्रवारी गोंधळ घालणाऱ्या पावसाने शनिवारी तिथे विश्रांती घेतली. मात्र, या पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला.

मुंबई : उपराजधानी नागपूरसह विदर्भात शुक्रवारी गोंधळ घालणाऱ्या पावसाने शनिवारी तिथे विश्रांती घेतली. मात्र, या पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. मुसळधार पावसामुळे ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली. येथील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, काहींना तर पूर आला आहे.रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना पावसाने झोडपले. रायगडमध्ये सावित्री नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण महाड शहरात व तेथील बाजारपेठेमध्ये पाणी शिरले होते. जगबुडी नदीचे पाणी कळंबणी (ता. खेड) येथे आल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला. रेल्वेसेवेलाही ब्रेक लागला. वसईच्या चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या १२0 पैकी ९७ पर्यटकांची सुटका करण्यात आली. वसईचा पट्टाही पाण्याखालीच आहे. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत महाडमध्ये २०५ मि.मी. पाऊस झाला. सावित्री नदीला पूर आला असून, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा भरून वाहत आहेत. रसायनी-आपटा, पाली-खोपोली रोहा-नागोठणे रोड या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. उल्हास, गाढी या नद्या, तसेच भिरा धरण क्षेत्रातील गावे, वाड्या-वस्त्यांना सतर्कतेचा इशारा आहे.ठाणे जिल्ह्यात विक्रमी पाऊसठाणे जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला. भिवंडी, मुरबाड, मुंब्रा, उल्हासनगर येथील सखल भागांत पाणी साचल्याने अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले होते. उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, ठाणे, मुंब्रा, दिवा परिसरांतील ठिकठिकाणच्या चाळीतील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचे हाल झाले.वासिंद परिसरातील ४२ गावांचा ठिकठिकाणच्या नदीनाल्यांच्या पुरामुळे संपर्क तुटला आहे. भातसा, तानसा, मुरबाडी, कामवारी, उल्हास, वालधुनी या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. कल्याण-नगर आणि मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.उल्हास नदीच्या पुराचे पाणी रायता पुलावरून वाहू लागल्यामुळे तो दुपारी १२.३० वाजता वाहतुकीस बंद करावा लागला.यामुळे कल्याण-नगर महामार्गावरील वाहतूक दीर्घकाळ खोळंबली. माळशेज घाटातही धुके वाढले आहे. यामुळे या घाटातील वाहतूकही धिम्या गतीने होत आहे.९७ जणांची सुखरूप सुटकावसईतील धोकादायक असलेल्या चिंचोटी धबधब्याच्या परिसरात १२0 पर्यटक अडकून पडले होते. त्यापैकी ९७ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, भावेश गुप्ता (३५) या पर्यटकाचा मृत्यू झाला. इतरांना सोडविण्याचे काम सुरू आहे. हे सर्व पर्यटक मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांतून पर्यटनासाठी येथे आल्याची माहिती वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली.जगबुडीवरील पूल धोकादायक.मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी नदीवर असलेला पूल ब्रिटिशकालीन आहे. सध्या हा पूल इतका धोकादायक आहे की, त्यावरून वाहन गेले की तो हलतो. तरीही त्या पुलावरून वाहतूक सुरू असते.येत्या २४ तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.नांदेड, हिंगोलीत जोर :मराठवाड्यात नांदेड व हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर होता. किनवट तालुक्यात वीज पडून एक आदिवासी गरोदर महिला मृत्युमुखी पडली.मुंबईकरांचे हाल कायमचया पावसामुळे कल्याण ते बदलापूर रेल्वे मार्ग काही तासांसाठी बंद करण्यात आला. तिथे रेल्वे रुळांवरही पाणी साचले होते. सतत कोसळणारा पाऊ स व रस्त्यांवर पडलेले खड्डे, तसेच ठिकठिकाणी मेट्रो रेल्वेची सुरू असलेली कामे यामुळे रस्त्यांवरील वाहतूक पुरती मंदावली होती.मुंबईतही जोर‘धार’मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. उपनगराच्या तुलनेत मुंबई शहरात मात्र पावसाचा जोर कमी होता.पावसामुळे लोकल सेवेला लेटमार्क लागला. मानखुर्दमध्ये शॉर्टसर्किटमुळे एका महिलेचा मृत्यू झाला.कर्जत व पनवेल मार्गावरील रूळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेसेवेचा खोळंबली होती तर विठ्ठलवाडी येथील रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कर्जत ते कल्याण दरम्यानची रेल्वे वाहतूकदेखील काही काळ ठप्प झाली होती.मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेची सेवा बंद पडली नाही. मात्र, तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक विलंबाने सुरू होती, पण शनिवार असल्याने लोकांचे हाल झाले नाहीत.

टॅग्स :Rainपाऊसkonkanकोकण