शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अवघे कोकण पाण्याखाली! ठाणे, रायगड, पालघरमध्ये पूरस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 06:33 IST

उपराजधानी नागपूरसह विदर्भात शुक्रवारी गोंधळ घालणाऱ्या पावसाने शनिवारी तिथे विश्रांती घेतली. मात्र, या पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला.

मुंबई : उपराजधानी नागपूरसह विदर्भात शुक्रवारी गोंधळ घालणाऱ्या पावसाने शनिवारी तिथे विश्रांती घेतली. मात्र, या पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. मुसळधार पावसामुळे ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली. येथील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, काहींना तर पूर आला आहे.रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना पावसाने झोडपले. रायगडमध्ये सावित्री नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण महाड शहरात व तेथील बाजारपेठेमध्ये पाणी शिरले होते. जगबुडी नदीचे पाणी कळंबणी (ता. खेड) येथे आल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला. रेल्वेसेवेलाही ब्रेक लागला. वसईच्या चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या १२0 पैकी ९७ पर्यटकांची सुटका करण्यात आली. वसईचा पट्टाही पाण्याखालीच आहे. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत महाडमध्ये २०५ मि.मी. पाऊस झाला. सावित्री नदीला पूर आला असून, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा भरून वाहत आहेत. रसायनी-आपटा, पाली-खोपोली रोहा-नागोठणे रोड या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. उल्हास, गाढी या नद्या, तसेच भिरा धरण क्षेत्रातील गावे, वाड्या-वस्त्यांना सतर्कतेचा इशारा आहे.ठाणे जिल्ह्यात विक्रमी पाऊसठाणे जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला. भिवंडी, मुरबाड, मुंब्रा, उल्हासनगर येथील सखल भागांत पाणी साचल्याने अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले होते. उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, ठाणे, मुंब्रा, दिवा परिसरांतील ठिकठिकाणच्या चाळीतील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचे हाल झाले.वासिंद परिसरातील ४२ गावांचा ठिकठिकाणच्या नदीनाल्यांच्या पुरामुळे संपर्क तुटला आहे. भातसा, तानसा, मुरबाडी, कामवारी, उल्हास, वालधुनी या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. कल्याण-नगर आणि मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.उल्हास नदीच्या पुराचे पाणी रायता पुलावरून वाहू लागल्यामुळे तो दुपारी १२.३० वाजता वाहतुकीस बंद करावा लागला.यामुळे कल्याण-नगर महामार्गावरील वाहतूक दीर्घकाळ खोळंबली. माळशेज घाटातही धुके वाढले आहे. यामुळे या घाटातील वाहतूकही धिम्या गतीने होत आहे.९७ जणांची सुखरूप सुटकावसईतील धोकादायक असलेल्या चिंचोटी धबधब्याच्या परिसरात १२0 पर्यटक अडकून पडले होते. त्यापैकी ९७ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, भावेश गुप्ता (३५) या पर्यटकाचा मृत्यू झाला. इतरांना सोडविण्याचे काम सुरू आहे. हे सर्व पर्यटक मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांतून पर्यटनासाठी येथे आल्याची माहिती वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली.जगबुडीवरील पूल धोकादायक.मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी नदीवर असलेला पूल ब्रिटिशकालीन आहे. सध्या हा पूल इतका धोकादायक आहे की, त्यावरून वाहन गेले की तो हलतो. तरीही त्या पुलावरून वाहतूक सुरू असते.येत्या २४ तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.नांदेड, हिंगोलीत जोर :मराठवाड्यात नांदेड व हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर होता. किनवट तालुक्यात वीज पडून एक आदिवासी गरोदर महिला मृत्युमुखी पडली.मुंबईकरांचे हाल कायमचया पावसामुळे कल्याण ते बदलापूर रेल्वे मार्ग काही तासांसाठी बंद करण्यात आला. तिथे रेल्वे रुळांवरही पाणी साचले होते. सतत कोसळणारा पाऊ स व रस्त्यांवर पडलेले खड्डे, तसेच ठिकठिकाणी मेट्रो रेल्वेची सुरू असलेली कामे यामुळे रस्त्यांवरील वाहतूक पुरती मंदावली होती.मुंबईतही जोर‘धार’मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. उपनगराच्या तुलनेत मुंबई शहरात मात्र पावसाचा जोर कमी होता.पावसामुळे लोकल सेवेला लेटमार्क लागला. मानखुर्दमध्ये शॉर्टसर्किटमुळे एका महिलेचा मृत्यू झाला.कर्जत व पनवेल मार्गावरील रूळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेसेवेचा खोळंबली होती तर विठ्ठलवाडी येथील रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कर्जत ते कल्याण दरम्यानची रेल्वे वाहतूकदेखील काही काळ ठप्प झाली होती.मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेची सेवा बंद पडली नाही. मात्र, तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक विलंबाने सुरू होती, पण शनिवार असल्याने लोकांचे हाल झाले नाहीत.

टॅग्स :Rainपाऊसkonkanकोकण