शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

गोव्यासह संपूर्ण राज्यात जुलैअखेरपर्यंत दमदार पाऊस राहणार : डॉ. अनुपम कश्यपि

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 12:47 IST

सध्या विदर्भ व मराठवाड्यासह ३१ जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने कठीण स्थिती निर्माण झाली आहे़. मात्र , जुलैअखेरपर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे़.

ठळक मुद्देविदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता  पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र

पुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून दक्षिण महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीवर हे कमी दाबाचे क्षेत्र पसरले आहे़. ते केरळपर्यंत विस्तारणार आहे़. त्याचबरोबर बंगालच्या खाडीमध्ये उंचस्तरावर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे़. त्यामुळे ओडिशा किनारपट्टीपासून ते पश्चिमेकडे येण्याची शक्यता आहे़. त्यामुळे येत्या १९ जुलैच्या सायंकाळपासून राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण वाढलेले दिसून येईल़. हा पाऊस २२, २३ जुलैपर्यंत राहणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल़. २४ जुलैला पावसाचे प्रमाण थोडे कमी होईल, अशी माहिती डॉ़. अनुपम कश्यपि यांनी दिली आहे. 

कश्यपि यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर लगेचच आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे जुलैअखेरपर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे़. सध्या विदर्भ व मराठवाड्यासह ३१ जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने कठीण स्थिती निर्माण झाली आहे़. या पावसामुळे जुलै महिन्यातील पावसाची सरासरी भरुन काढण्याची शक्यता आहे. 

पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण भारतात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने केरळसह कर्नाटक, तामिळनाडु, आंध्र प्रदेश किनारपट्टी तेलगंणा, कोकण, गोव्यासह संपूर्ण मराठवाड्यात पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे़. १९ व २० जुलैला संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार तर २१ व २२ जुलैला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.

पश्चिम किनाऱ्यावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने केरळ, कर्नाटकाच्या किनारपट्टी भागात पुढील चार दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. या कमी दाबाच्या क्षेत्राचा फायदा महाराष्ट्रालाही मिळणार आहे़. कोकण, गोव्यात १९ ते २२ जुलै दरम्यान कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस होणार असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़. मराठवाड्यात चारही दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकेल़. विदर्भात १९ व २० जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. हवामान विभागाच्या वतीने पुढील २ आठवड्यांचा अंदाज गुरुवारी जाहीर करण्यात आला़ १९ ते २४ जुलै दरम्यान मॉन्सून सक्रीय राहणार असून त्यामुळे लक्ष्यद्वीप, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र, अंदमान, निकोबार, उत्तरपूर्व राज्ये, हिमालयीन रांगा व पश्चिम बंगाल, सिक्कीम येथे सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे़. या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे़ तर, २५ ते ३१ जुलै दरम्यान देशातील अनेक भागात पावसाच्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता असून सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़. ...............रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ ते २२ जुलै या चारही दिवसात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़. पुणे कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद या जिल्ह्यात १९ ते २२ जुलै दरम्यान चारही दिवसा बहुतांश ठिकाण पाऊस होईल़. नाशिक जिल्ह्यात २० ते २२ जुलै, जालना व परभणी जिल्ह्यात १९ व २० जुलै तसेच हिंगोली जिल्ह्यात १९ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे़. 

टॅग्स :goaगोवाRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरीagricultureशेती