शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोनाच्या स्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिली चिंता वाढवणारी माहिती, म्हणाले, ‘जानेवारी-फेब्रुवारीत रुग्ण वाढतील’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 11:01 IST

Coronavirus in Maharashtra : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी विधानसभेत राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत चिंतेत भर घालणारी माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी भीती Rajesh Tope यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई - कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्या एक दोन महिन्यांमध्ये राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येत होते. मात्र गेल्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या अचानकपणे वाढल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी मंगळवारी विधानसभेत राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत चिंतेत भर घालणारी माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी भीती राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील कोरोनास्थितीबाबत माहिती देताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आतापर्यंत १६७ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. आज राज्यात कोरोना रुग्णवाढीचा जो ६००-७०० दरम्यान आकडा होता तो एकदम वाढला आहे. राज्यात १६०० नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे गती अशीच वाढत गेली तर ओमायक्रॉनचा रुग्णदुप्पटीचा वेग हा एक-दोन दिवसांचा आहे. आज रुग्णसंख्या कमी असल्याने तो आकडा कमी दिसत आहे. मात्र रुग्णसंख्या वाढली तर रुग्ण दुपटीचे प्रमाण वेगाने वाढून मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होईल आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ दिसून येईल. त्यामुळे ओमायक्रॉनच्या संदर्भात आपण सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे, असं आवाहनही राजेश टोपे यांनी यावेळी केले.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेल, अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर आता आरोग्यमंत्र्यांनी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात राज्यात कोरोना रुग्णवाढ होईल, अशी भीती व्यक्त केल्याने चिंता वाढली आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, काल राज्यात तब्बल २ हजार १७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईत मंगळवारी १ हजार ३७७ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या शहर उपनगरात ५ हजार ८०३ रुग्ण उपचाराधीन आहेत. सोमवारी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ९६७ दिवसांवर होता. मंगळवारी हे प्रमाण ८४१ दिवसांवर आले आहे, तर २१ ते २७ डिसेंबरपर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.९ टक्के झाला आहे. सोमवारी हा दर ०.७ टक्के इतका होता. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य