शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

निवडणुकीत ठाकरेंची 'मशाल' हाती न घेण्यामागचं कारण काय?; राजू शेट्टींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 18:04 IST

Loksabha Election 2024: हातकणंगले मतदारसंघातील निवडणुकीवरून उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यातील चर्चा फिस्कटली. त्यामुळे आता या मतदारसंघात सत्यजित पाटील यांना ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आली आहे. 

कोल्हापूर - Raju Shetty on Uddhav Thackeray ( Marathi News ) महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने हातकणंगले मतदारसंघात उमेदवार दिला आहे. राजू शेट्टी यांच्याशी सुरू असलेली ठाकरे गटाची बोलणी फिस्कटली. शेट्टींनी उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर लढण्यास असमर्थता दाखवली त्यामुळे आता या जागेवर ठाकरेंकडून सत्यजित पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. वैयक्तिक फायद्यासाठी मशाल चिन्हावर लढणार नाही असं सांगत राजू शेट्टींनी आता ही निवडणूक जनतेनं हाती घ्यावी असं आवाहन केले आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, स्वाभिमान शेतकरी संघटना महायुतीतून बाहेर पडली होती. त्याचं कारण म्हणजे तीन तुकड्यांमधील एफआरपी, भूमिअधिग्रहण कायद्यात दुरुस्तीबाबत जो काही निर्णय झाला त्याला धोरणात्मक विरोध म्हणून आम्ही महायुतीतून बाहेर पडलो. त्यानंतर स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी सुरू होती. गेल्या ३ वर्षापासून आम्ही तयारी करतोय. त्या मधल्या काळात भाजपाचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा अशी मागणी पुढे आली. हातकणंगलेमध्ये उमेदवार देणार नाही अशी भूमिका मविआच्या नेत्यांची घेतली होती असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत जर तिथे मविआनं उमेदवार दिला नाही तर भाजपाविरोधी मतांची विभागणी होणार नाही या भूमिकेतून मी दोनदा उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. परंतु नंतर अचानक काय झालं माहिती नाही. २ दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंकडून निरोप आला तुम्ही मशाल चिन्हावर लढलं पाहिजे. मशाल चिन्ह शिवसेना ठाकरे गटाला मिळालंय. मी त्या चिन्हावर लढणं याचा अर्थ मी शिवसेनेत प्रवेश केल्यासारखं आहे. गेली ३० वर्ष मी शेतकरी चळवळीत काम करतोय. मी माझ्या आयुष्यात कुठल्याही राजकीय पक्षात काम केले नाही. निवडणूक लढवायला सोपे जावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यात माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी शेतकऱ्यांना आणि संघटनेला वाऱ्यावर सोडून मी ही निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे मी मशाल चिन्ह घेणार नाही असं कळवलं असा खुलासा राजू शेट्टी यांनी केला. 

दरम्यान,  हातकणंगलेतून त्यांनी उमेदवार जाहीर केला आहे. हा त्यांचा अधिकार आहे. खऱ्या अर्थाने गोरगरिब, शेतकऱ्यांचा, मजुरांचा आवाज संसदेत पोहचवण्याची जबाबदारी ही गावकऱ्यांनी घेतली पाहिजे. ही निवडणूक लोकांनी हातात घ्यावी. ही निवडणूक लढवू आणि जिंकूही अशी मला खात्री आहे असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघात ध्यैर्यशील माने, राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :hatkanangle-pcहातकणंगलेRaju Shettyराजू शेट्टीUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४