शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

‘टोळी’वर उतारा ‘हार्वेस्टर’चा !

By admin | Published: December 06, 2015 2:29 AM

ऊसतोडणीसाठी लागणाऱ्या टोळीवर उतारा म्हणून आता ‘हार्वेस्टर’चा वापर वाढला आहे. ऊसतोडणीचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न त्यामुळे काही प्रमाणात सुटला आहे.

- शेषराव वायाळ,  परतूर (जि.जालना)

ऊसतोडणीसाठी लागणाऱ्या टोळीवर उतारा म्हणून आता ‘हार्वेस्टर’चा वापर वाढला आहे. ऊसतोडणीचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न त्यामुळे काही प्रमाणात सुटला आहे.शेतकऱ्यांना ऊसतोडीसाठी एकमेव मार्ग असतो, ऊसतोड कामगारांचा. एका टोळीत १० कामगार असतात. ऊसतोडीला एका टोळीसाठी ५ ते ६ लाख रुपये मोजावे लागतात. मात्र टोळ्या मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. टोळी मिळाल्यानंतर शेतकरी मोकळा श्वास घेतो. ऊसतोड टोळ्या साखर कारखान्याकडून पैशांची उचल घेतात. त्यात मध्यस्थी म्हणून पुन्हा एक मुकादम असतो. कारखाना सुरू होण्याच्या काळात टोळ्यांची जुळवाजुळव करून मुकादम कारखान्याच्या ताब्यात देतो. टोळ्यांची खाण्याची, राहण्याची व्यवस्था करायची. त्यात पुन्हा टोळ्या पळून जाणे, शेतकऱ्यांच्या चढाओढीतून त्यांची पळवापळवी, ऊसमालकाने पुन्हा रोख पैसे किंंवा उसाचे वाढे टोळीलाच देणे असे अनेक प्रश्न सोडवावे लागतात.साखर कारखान्याचे प्रश्न, राजकारण आदी अडचणींमुळे ऊसलागवड म्हणजे बरेचदा डोकेदुखी होते. टोळी प्रश्नावर ऊसउत्पादकांना ‘हार्वेस्टर’ हे एक प्रकारे वरदान ठरले आहे.त्यामुळे ऊसतोडणीची समस्या बऱ्याच प्रमाणात सुलभ झाली आहे. कारखाना सुरू झाल्यानंतर होणारी शेतकऱ्यांची धावपळ त्यामुळे थांबली आहे. आपला संपूर्ण ऊस कारखान्यावर वेळेवर जाणार, याची खात्री शेतकऱ्यांना या यंत्रामुळे वाटू लागली आहे. दिवसाला ५० टन तोडएक हार्वेस्टर दिवसात ५० ते ५५ टन ऊस तोडतो. एक टोळी दिवसाला ११ ते १२ टन ऊस तोडते. हार्वेस्टरने काढलेल्या उसाचे पाचट जाळण्याची गरज नसते. त्याचे खत होते. हार्वेस्टरमुळे टोळ्यांचे काम ५० टक्क्यांवर आले आहे. कारखान्याला ३०० टोळ्या लागायच्या. परंतु सध्या कारखान्याकडे १३४ टोळ्या आहेत. हार्वेस्टर यंत्रामुळे शेतकऱ्यांची व कारखान्याची अडचण दूर झाली आहे. - शिवाजीराव जाधव, चेअरमन, बागेश्वरी साखर कारखाना