शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भाजपप्रवेशानंतर हर्षवर्धन पाटील बारामतीतून देणार राष्ट्रवादीला आव्हान ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 13:06 IST

लोकसभेला नाही, किमान विधानसभेला तरी बारामती जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी बारामतीतून निवडणूक लढविल्यास नवल वाटायला नको.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हट्टीपणामुळे आघाडीचं मोठ नुकसान झालं होतं. अहमदनगरच्या जागेसाठी काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील आग्रही होते. विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील या मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. परंतु, राष्ट्रवादीने ही जागा सोडली नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचं नुकसान झालं. आता इंदापूरच्या बाबतीतही राष्ट्रवादीने तिच भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा नुकसान होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अहमदनगरच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वाटाघाटी करण्यासाठी चर्चा झाली होती. परंतु, राष्ट्रवादीने ती जागा काँग्रेसला देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेले काँग्रेसनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच ते नगरमधून निवडूनही आले. त्यापाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपवासी झाले. त्यामुळे नुकसान काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचे झाले. राष्ट्रवादीची जागा गेली तर काँग्रेसचे विरोधीपक्षनेते गेले. तसेच पिचड पिता-पुत्रही भाजपवासी झाले. हे एवढ नुकसान एका जागेमुळे झाले.

माजीमंत्री आणि काँग्रेसनेते हर्षवर्धन पाटील इंदापूरच्या जागेसाठी आग्रही आहेत. परंतु, ही जागा राष्ट्रवादीने आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी बुधवारी मेळावा घेत कार्यकर्त्यांना पुढे काय करायचे विचारले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकला.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्याला बारामती मतदार संघातून निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. परंतु, आपण राष्ट्रवादीला शब्द दिल्याचे त्यांना सांगितले. तसेच सुप्रिया सुळे यांना मदत करण्यासाठी राहुल गांधी यांनी आपल्याला सांगितले होते. तर शरद पवारांनी इंदापूरविषयी निश्चित राहा असंही सांगितले होते. मात्र आता त्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे आपण आपली भूमिका १० सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. एकूणच पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येते.

अजित पवारांना आव्हान ?

राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे व्यथीत झालेले हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाणार हे जवळ-जवळ निश्चित मानले जात आहे. याचा फायदा घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होऊ शकतात. अर्थात हर्षवर्धन पाटील यांना मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा एकदा बारामतीतून निवडणूक लढविण्याची ऑफर मिळू शकते. बारामती विधानसभा मतदार संघ अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीकडे असून अजित पवार येथून आमदार आहेत. लोकसभेला नाही, किमान विधानसभेला तरी बारामती जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी बारामतीतून निवडणूक लढविल्यास नवल वाटायला नको.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसindapur-acइंदापूरbaramati-acबारामती