शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

हापूसला पंधरवड्यात नुकसानभरपाई

By admin | Updated: May 29, 2015 00:02 IST

मुख्यमंत्री : मार्गताम्हाणेतील कार्यक्रमात ग्वाही ; कोकणच्या पर्यटन विकासासाठी पाच वर्षांचा आराखडा

गुहागर : अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. नुकसानभरपाई नेमकी कशी द्यावी, याचा अहवाल देण्याची सूचना आपण अधिकाऱ्यांना केली आहे. येत्या पंधरा दिवसांत या भरपाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील पद्मावती देवी मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा फडणवीस यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. वसंतराव भागवत, डॉ. तात्या नातू यांच्या कर्मभूमीत यायला मिळाले हे भाग्यच असल्याचे सांगताना संस्काराच्या भक्कम पायावरच मुख्यमंत्री होता आल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले.सर्व प्रकारांची शिल्पे एकत्र करून हे मंदिर बांधले गेले आहे. भारताचा एकसंधपणा यातून दिसतो. हे मंदिर समाज परिवर्तनाचे केंद्र झाले पाहिजे, असे ते म्हणाले. कोकणात भरपूर पाऊस पडूनही शेतीसाठी, फलोत्पादनासाठी उपयोग होत नाही. पावसाचे सर्व पाणी समुद्राला मिळते. त्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याची चळवळ उभारण्याचे काम जोमाने सुरूआहे. महाराष्ट्रात ६ हजार गावात ७० हजार कामे जलयुक्त शिवार योजनेतून सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसहभागातून ४२ कोटी रुपयांची कामे केली. खटाव व माणसारख्या दुष्काळी गावातून एवढ्या मोठ्या प्रमाणात काम चालू आहे की, पुढील काळात तेथे टँकर द्यावा लागणार नाही. महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडूनही काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष नियोजन करून गावागावांत पाण्याचे विकेंद्रित साठे निर्माण करून त्या माध्यमातून गावाची उत्पन्न क्षमता कशी वाढेल, यावर भर देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.पर्यटन हे कोकणचे बलस्थान आहे. पाच वर्षे योग्य प्रकारे नियोजन केले तर गोव्यापेक्षा जास्त पर्यटक कोकणामध्ये दिसू शकतात एवढी कोकणाची क्षमता आहे. यासाठी जिल्ह्याचा पर्यटन आराखडा करण्याचे काम सुुरू आहे. सिंधुदुर्गमधील सी-वर्ल्डचा प्रश्न सोडविण्यात आला. या प्रकल्पासाठी ८०० एकर एवढी अनावश्यक जागा कमी करून दोनशे एकर केल्यानंतर लोकांनी चांगले सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.या मंदिरामध्ये पुढील काळात संस्कार केंद्र चालविली जाणार असून, मार्गताम्हाणे गावाच्या विकासासाठी हे गाव दत्तक घेतल्याचे भाजप प्रवक्ते मधू चव्हाण यांनी जाहीर केले. यावेळी आमदार भास्कर जाधव, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, बाळ माने, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवार योजनेला मागणीजलयुक्त शिवार योजनेत आम्हालाही सहभागी करा, अशी गावागावांतून मागणी होत आहे. जलयुक्त शिवार योजना येथे संपत नाही. पाण्याचे नीट नियोजन केल्यानंतर शेती विकास व मार्केटिंगपर्यंत संपूर्ण साखळी तयार करण्याचे काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.यावर्षी आंब्यावर मोठे संकट आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा झाली आहे. कशा प्रकारे मदत करायची याचा अहवाल देण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. त्यावर पुढील दोन मंत्रिमंडळांमध्ये निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.