शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा, विदर्भात वीज पडून चौघांचा मृत्यू : मराठवाडा, खान्देशलाही झोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 08:49 IST

Unseasonal Rains: गेल्या दोन दिवसांपासून राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून, शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र, लातूर, परभणी, रत्नागिरी आणि विदर्भात भंडारा तसेच यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला.

मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून, शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र, लातूर, परभणी, रत्नागिरी आणि विदर्भात भंडारा तसेच यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. तीन ठिकाणी वीज पडल्याने विदर्भात चौघांचा मृत्यू झाला. 

प. महाराष्ट्रात जोर’धार’ कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस झाला. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी येथे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. कोल्हापूर शहरात काही ठिकाणी गारपीट झाली. सांगलीत शिराळा तसेच खानापूर तालुक्यातील लेंगरे परिसरात मेघगर्जनेसह पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे मुसळधार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील सोनवडी, गजवडी परिसरात गारांचा पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरीत पहाटे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, खेड आदी भागांत जोरदार पाऊस झाला.

नागपुरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरीने गारवा नागपूर : नागपूरकरांची उन्हाच्या काहिलीतून पावसाने सुटका केली. बुधवारनंतर गुरुवारीही पहाटे वादळी वाऱ्यासह व दुपारी गडगडाटासह पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते.  

जालना, लातुरात गारपीटपरभणी : परभणी जिल्ह्यात मानवत रोड, मानवत शहर, झरी, बामणी, येलदरी येथे वादळी वाऱ्यासह गुरुवारी दुपारी चार ते सहाच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. लातूर : शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारा पडल्याने कांदा, टरबूज, खरबूज, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना : जिल्ह्यातील विविध भागांत गुरूवारी दिवसभरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात फळपिकांसह रब्बीतील पिकांचेही मोठे नुकसान झाले. भोकरदन तालुक्यातील वरूड बुद्रूक येथील जिल्हा परिषद शाळेच्या तीन वर्गखोल्यांवरील पत्रे उडून गेली. भोकरदन, मंठा तालुक्यातील काही भागात गारपीटही झाली.

भंडारा २, वाशिम १, तर यवतमाळात एकाचा मृत्यूभंडारा जिल्ह्यातील पाथरी (ता. तुमसर) येथे दुपारी विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. शेतातून घरी परतत असताना तिघे जण झाडाखाली थांबले होते. त्याच वेळी झाडावर वीज कोसळली. यात मनीषा भारत पुष्पतोडे (३२), प्रमोद मनिराम नागपुरे (४२) या दोघांचा मृत्यू झाला.यवतमाळमधील झरी तालुक्यात बंदी वाढोणा येथे वसंता नरसिंग चव्हाण (३८) यांचा तर वाशिम जिल्ह्यात कवठा (ता. रिसोड) येथे चंद्रविलास काठोळे (४०) या मजुराचा वीज पडून मृत्यू झाला.  

आजही अवकाळीचा इशाराभारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात शुक्रवारीही काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस पडेल. 

नाशिक : पिकांचे नुकसाननाशिक जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, टोमॅटो, मिरची, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका कळवण, बागलाण तालुक्यांना बसला आहे. १२०० ते १३०० हेक्टरवरील कांद्याला फटका बसल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रweatherहवामान अंदाज