शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

गुणरत्न सदावर्तेंची मराठा आरक्षणाविरोधात याचिका; शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 13:59 IST

खुल्या वर्गावरील अन्याय थांबवावा यासाठी तातडीने यावर सुनावणी घेण्याची विनंती आम्ही कोर्टाला केली. त्यावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने येत्या शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.

मुंबई - Gunratna Sadavarte on Maratha Reservation ( Marathi News ) मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी होणार असून यासाठी राज्य सरकारला नोटीसही पाठवली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. त्याला सदावर्ते यांनी विरोध केला. 

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, आम्ही उच्च न्यायालयाला भूमिका सांगितली, खुल्या वर्गासाठी कुणी आहे की नाही. सगळेजण आपापल्या जातीसाठी उभे राहतंय. आज महाराष्ट्रातील आरक्षण ७३ टक्क्यांवर गेले, केवळ ३८ जागा खुल्या वर्गासाठी राहिल्या. हा अन्याय खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी बोलका आहे. याआधीही दोनदा आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला. निवडणूक आली की विरोधातील पक्ष आणि सत्तेतील पक्ष तेच राजकारण करतात. निवडणूक तोंडावर आहेत, १६ हजार जागांवर भरती सुरू आहे. खुल्या वर्गावरील अन्याय थांबवावा यासाठी तातडीने यावर सुनावणी घेण्याची विनंती आम्ही कोर्टाला केली. त्यावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने येत्या शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. याबाबत सरकारलाही नोटीस बजावण्यात आली आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मराठा आरक्षण SEBC म्हणून जे १० टक्के दिलंय ते असंविधानिक आहे. हे आरक्षण रद्द व्हावे. महाराष्ट्र शासनाने विधेयक पास केले, हरकती न मागवता विधेयक मंजूर केले ते रद्द व्हावे. भटक्या विमुक्तांपेक्षा जास्त मागास मराठा समाजाला दाखवण्यात आले. मराठा कुणबीकरण होऊ शकत नाही. मराठ्यांना कुणबी म्हणून दाखले देता येणार नाही. या सर्व बाबी घेऊन आम्ही न्यायालयात आलो आहोत असं सदावर्ते म्हणाले. 

दरम्यान, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी काही राजकीय वातावरण निर्माण केले. प्रत्येक राजकीय पक्ष आपापली व्होट बँक शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. विरोधक आणि सत्ताधारी यांनी दोघांनी हात मिळवणी करून हे १० टक्के आरक्षण दिले. हे सगळेजण एका बाजूने बोलत आहे. परंतु जे खुल्या वर्गातील आहेत त्यांना कुणीही विचारात घेत नाहीत. आरक्षण वाढवले तर तुमच्या जागा कमी होतील, त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल असं विचारलं जात नाही. परिणामांची चिंता ना शरद पवारांना आहे ना सत्तेत बसलेल्यांना आहे. म्हणून आमच्यावर ही वेळ आलेली आहे. उच्च न्यायालय सोडून दुसरं कुणी काळजी घेऊ शकणार नाही. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे असंही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलHigh Courtउच्च न्यायालय