शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:40 IST

निवडणुकीच्या पद्धतीबाबत लोकांमध्ये शंका निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शरद पवारांनी केली.

मुंबई - काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतचोरी केल्याचं म्हटलं आहे. त्यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही सर्वात मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत १६० जागा निवडून आणण्याची गॅरंटी २ जणांनी मला भेटून दिली होती असं पवारांनी म्हटलं. मात्र पवारांच्या या विधानावर भाजपानेही पलटवार केला आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, त्यानंतर दिल्लीत मला काही जण भेटायला आले. २ जण होते. महाराष्ट्रात २८८ विधानसभेच्या जागा आहेत. आम्ही तुम्हाला १६० जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो अशी त्यांनी ऑफर दिली. तेव्हा माझ्या मनात निवडणूक आयोग याबद्दल काही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात मात्र मी त्याकडे दुर्लक्ष करतो. या भेटीनंतर राहुल गांधी यांच्यासोबत मी त्या लोकांची भेट घालून दिली. त्या लोकांना जे म्हणायचे होते, ते त्यांनी राहुल गांधींसमोर म्हटले. परंतु राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण पडू नये, हा आपला रस्ता नाही. आपण लोकांपर्यंत जाऊ, लोकांचा पाठिंबा मागू, जे निर्णय असेल तो स्वीकारू असं ठरले असं त्यांनी सांगितले. 

निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे, भाजपानेही नाही

तसेच निवडणुकीच्या पद्धतीबाबत लोकांमध्ये शंका निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे काही दूध का दूध, पानी का पानी झाले पाहिजे हा आमचा आग्रह आहे. आक्षेप हा मुख्यमंत्र्‍यांबद्दल नाही. आक्षेप निवडणूक आयोगावर घेतला आहे. मग भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री नेहमी पुढे येऊन का बोलतात हे समजत नाही. आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवंय, दुसऱ्यांकडून नाही. आमची माहिती चुकीची असेल तर निवडणूक आयोगाने देशाला सांगायला हवे. सत्य समोर यायला हवे. सोमवारी संसदेतील आमचे सगळे सहकारी निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत असं शरद पवारांनी सांगितले. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यात कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील मतदारांबाबत भाष्य केले, जिथे निवडणूक नाही. लोकांसमोर जे आरोप ठेवले आहेत त्यावर गृहमंत्र्यांची उत्तर देण्याची जबाबदारी होती. मात्र आरोपांपासून दुसरीकडे लक्ष वळवण्याचं काम भाजपाकडून केले जात आहे. मागील १५ दिवसांपासून मतदार याद्यांच्या घोळाबाबत संसदेत गदारोळ सुरू आहे असं पवारांनी म्हटलं. 

'त्या' दोघांचा सरकारने शोध घ्यावा - भाजपा

शरद पवारांचा दावा अत्यंत बालिश आणि हास्यास्पद आहेत. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने बालबोध दावे करणारे खरेच आश्चर्यकारक आहेत. जर आपल्याकडे अशी २ माणसे आली होती तर तुम्हाला निवडणुकीत काही गडबड करायची होती का हा उद्देश होता का, त्या माणसांबाबत तातडीने पोलीस किंवा संबंधित यंत्रणांकडे तक्रार का केली नाहीत. उलटपक्षी या लोकांना घेऊन तुम्ही राहुल गांधींकडे गेला. म्हणजेच राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून तुम्हाला अशा गोष्टींना समर्थन देण्याचा विचार होता का, त्यामुळे आता सगळे झालंय, राहुल गांधी, काँग्रेस, शरद पवार हे सगळे विचलित झालेत. हतबलतेतून या गोष्टी पुढे येत आहेत. लोकसभेला तुमच्या बाजूने निकाल लागला तेव्हा तुम्हीच याच प्रकाराचा आधार घेतला पण विधानसभेला शक्य झाले नाही असं म्हणायचे का..हे कुणाला पटणारे नाही. जेव्हा तुमच्याकडे हा प्रकार आला तेव्हाच तक्रार केली पाहिजे होती. या २ व्यक्ती कोण याचा तपास झाला पाहिजे किंवा सरकारने यात सुमोटा घेऊन त्या २ व्यक्तींचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी करत भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी पवारांचा दावा फेटाळला आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा