शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राज्याचा विकासदर घटला, बेरोेजगारीत दीड लाखांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 6:00 AM

राज्यात दीड लाखांनी रोजगार घटले असून, विदेशी गुंतवणुकीचा टक्काही घसरला आहे, अशी चिंता आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त झाली आहे.

मुंबई : राज्याचा विकास दर २०१८-१९ मध्ये ७.५ टक्के अपेक्षित असताना ६ टक्केच राहिला. चालू वर्षातही तो ५.७ टक्क्यांवर आला आहे. राज्यात दीड लाखांनी रोजगार घटले असून, विदेशी गुंतवणुकीचा टक्काही घसरला आहे, अशी चिंता आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त झाली आहे. राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर होणार आहे. त्यापूर्वी वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आर्थिक पाहणी अहवाल मांडला. राज्याचे आर्थिक चित्र फारसे समाधानकारक नसल्याचे त्यातून दिसते. सन २०१८-१९ मध्ये राज्यात ७३ लाख ५० हजार रोजगार होते. २०१९-२० मध्ये तो ७२ लाख ३ हजारवर आला. बेरोजगारी वाढली असून महाराष्ट्राचा बेरोजगारी दर ८.३ टक्के असून कर्नाटकचा ४.३%, गुजरातचा ४.१ % , पश्चिम बंगलचा ७.४ तर पंजाबचा ७.६ टक्के आहे.राज्याची महसुली तूट २० हजार २९३ कोटींवर गेली असून कर्जाचा बोजाही वाढला आहे. कर्ज २०१८-१९ मध्ये ४,१४,४११ कोटी होते. त्यावर ३३,९२९ कोटी एवढे व्याज द्यावे लागत होते. सन २०१९-२० मध्ये कर्ज ४,७१,६४२ कोटी झाले असून त्यापोटी ३५,२०७ कोटी व्याज द्यावे लागेल. स्थूल उत्पन्नाच्या तुलनेत राजकोषीय तूट २.७ टक्के झाली असून ऋणभार २२.४ टक्के झाला आहे. विदेशी गुंतवणुकीविषयी आधीच्या सरकारने खूप गाजावाजा केला. मात्र, विदेशी गुंतवणुकीत कर्नाटक पहिल्या तर महाराष्ट्र दोन नंबरवर आहे. गेल्या वर्षी राज्यात ८० हजार १३ कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक होती.कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात ३.१ टक्के वाढ अपेक्षित असताना मागील वर्षी हाच कृषी दर उणे २.२ टक्के होता. राज्याचे दरडोई उत्पन्न १ लाख ९१ हजार ७३७ एवढे झाले आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्टÑाचा देशात पाचवा नंबर आहे. हरयाणा, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू पहिल्या चारवर आहेत, अशी माहिती अहवालात आहे.>उत्पादन क्षेत्रात घटउत्पादन क्षेत्रातही घसरण असून ती ७.२ वरून ६ टक्क्यांवर आली आहे. सेवा क्षेत्रात घट असून ती ८.१% वरून ७.६% आली आहे.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी