शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

अधिक पारदर्शकतेसाठी जमिनींचे व्यवहार महारेराच्या कक्षेत यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 04:34 IST

महारेरा हा विकासक आणि ग्राहकांमधील व्यवहारावर लक्ष ठेवून आहे. मात्र या क्षेत्रातील इतर व्यवहारही महारेरांतर्गत येण्याची गरज आहे. कारण या क्षेत्रात सर्वात जास्त अपारदर्शकता आहे. त्यामुळे निवासी आणि व्यावसायिक गाळ्यांच्या व्यवहारात पारदर्शकता असली, तरी भविष्यात जमिनींचे व्यवहारही महारेराच्या कक्षेत येण्याची गरज आहे. त्याचा फायदा नक्कीच निवासी आणि व्यावसायिक गाळ्यांच्या खरेदी-विक्रीवर होईल.

- अमित हावरेमहारेरा हा विकासक आणि ग्राहकांमधील व्यवहारावर लक्ष ठेवून आहे. मात्र या क्षेत्रातील इतर व्यवहारही महारेरांतर्गत येण्याची गरज आहे. कारण या क्षेत्रात सर्वात जास्त अपारदर्शकता आहे. त्यामुळे निवासी आणि व्यावसायिक गाळ्यांच्या व्यवहारात पारदर्शकता असली, तरी भविष्यात जमिनींचे व्यवहारही महारेराच्या कक्षेत येण्याची गरज आहे. त्याचा फायदा नक्कीच निवासी आणि व्यावसायिक गाळ्यांच्या खरेदी-विक्रीवर होईल.महारेरा आला त्या वेळी विकासकांच्या मनात बऱ्याच शंका होत्या. मात्र अधिकारी वर्गानेतीन महिन्यांत घेतलेल्या बैठकांमुळे मोठ्या प्रमाणात शंकानिरसन झाले. म्हणूनच १० हजारांहून अधिक प्रकल्पांची नोंदणी झाली. रिअल इस्टेट क्षेत्रात पहिल्यांदाच एवढी मोठी घडामोड झाली असावी. सर्व प्रक्रिया आॅनलाइन, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला. अन्यथा शासकीय कार्यालयांत दफ्तर दिरंगाईची अनेक प्रकरणे आपण पाहतो. आॅनलाइनमुळे अवघ्या सात दिवसांत नोंदणी करण्याचे काम महारेराने करून दाखवले. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात आज बरेच बदल दिसत आहेत.महत्त्वाचा बदल म्हणजे नामांकित विकासक प्रथम सर्व परवानग्या घेऊन मग प्रकल्पाची घोषणा करायचे. मात्र काही विकासक परवानग्या मिळण्यापूर्वीच प्रकल्पाची घोषणा करायचे. हे नियमबाह्य ठरू शकते. म्हणूनच अशा नियमबाह्य काम करणाºया विकासकांना नियमात राहून काम करणाºया विकासकांकडून स्पर्धेला तोंड देणे कठीण जात होते. आता या गोष्टींना महारेराच्या येण्याने रोख लागली आहे. त्यामुळे ही अनधिकृत स्पर्धाच संपली आहे. गेल्या वर्षभरात नियमबाह्य काम करणाºयांना या क्षेत्रातून बाहेर पडावे लागले. ग्राहकांमधील जनजागृतीही अधिक वाढली आहे. त्यामुळे महारेरा नोंदणी नसेल, तर ग्राहक घर घेतच नाहीत. इतकेच नव्हे, तर जाहिरातीवरही महारेरा क्रमांक आहे का, याची पाहणी ग्राहक करतात.आज बाजारात वेगवेगळ्या प्रकारची मागणी आहे. महारेरामुळे प्रकल्पांना मिळालेल्या मंजुºया पारदर्शकपणे ग्राहकांना पाहता येतात. शिवाय जो विकासक सर्व नियमांचे पालन करतोय, त्याची विश्वासार्हताही वाढली आहे. याआधी विकासकांना गृह प्रकल्पात घरांची विक्री करताना ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी हातात मोठी फाइल घेऊन फिरावे लागत होते. आता आॅनलाइन झाल्यामुळे लोक घरबसल्या मंजुºया तपासतात. त्यामुळे विश्वासार्हता वाढून लोकांची निर्णय क्षमताही वाढली आहे.शासन कठोर असले, तर चोरी होत नाही; त्याप्रमाणेच दंड आकारल्याशिवाय नियमांचे पालन होणार नाही. सुरुवातीला बहुतांश विकासकांमध्ये महारेरासंदर्भात भीती होती. मात्र आता सर्वच विकासक खुल्या दिलाने महारेराचे स्वागत करत आहेत. कारण महारेरामुळे बांधकाम क्षेत्रात एक शिस्त निर्माण झाली. कोणताही विकासक अव्वाच्या सव्वा आश्वासने देऊ शकत नाही. महारेरामुळे जे देऊ शकतात, त्याचाच उल्लेख विकासकांना करावा लागत आहे.बेछूट जाहिरातींनाही महारेरामुळे लगामलागला आहे. दंडामुळेच या नियमांचे पालन होत आहे.प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी बँक खात्यात ७० टक्के रक्कम ठेवण्याच्या नियमांत बदल करण्याची गरज वाटते. त्यात थोडीशी लवचीकता असायला हवी. कारण प्रत्येक प्रकल्पात ७० टक्के रक्कम ही बांधकाम खर्चासाठी लागत नाही. काही प्रकल्पांत बांधकाम खर्च ७० टक्क्यांहून कमी असतो, तर जमिनीचा खर्च हा जास्त असतो. जागेनिहाय ही टक्केवारी बदलत असते. त्यामुळे प्रकल्पात जेवढा बांधकाम खर्च अपेक्षित आहे, तितकीच रक्कम बँक खात्यात ठेवण्याची तरतूद करण्याची गरज वाटते. ग्राहकांसाठी सर्व माहिती उघड करणे, प्रकल्पात पारदर्शकता ठेवणे हे रिअल इस्टेट क्षेत्रासाठी लाभदायक ठरेल. रिकामी घरे आणि विक्री झालेली घरे याची माहिती देणे विकासकासाठीही फायद्याचे आहे. एकंदरीतच संपूर्ण क्षेत्रावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल.(लेखक हे हावरे प्रॉपर्टीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आहेत)

टॅग्स :GovernmentसरकारReal Estateबांधकाम उद्योग