शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

शेतकऱ्यांना वेळेत भेटण्यासाठी कृषी सहायकांना मिळणार ग्रामपंचायतीत कार्यालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 06:46 IST

ग्रामपंचायत इमारतीत जागा : ; महाराष्ट्रातील ११ हजार ५९९ जणांना लाभ

नितीन काळेल सातारा : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती आणणाºया कृषी सहायकांना आता कामकाजासाठी ग्रामपंचायतीतच किमान १५० ते २०० चौरस फूट जागा कार्यालयासाठी मिळणार आहे. त्यामुळे या कार्यालयातूनच त्यांचे कामकाज चालणार असल्याने शेतकºयांनाही वेळेत ते उपलब्ध होतील. तसेच कृषी विभागाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ११ हजार ५९९ कृषी सहायकांना कामकाजासाठी हक्काची जागा मिळणार आहे.

राज्यातील कृषी विभागात साडेअकरा हजारांहून अधिक कृषी सहायक क्षेत्रीय पातळीवर काम करत आहेत. केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजना शेतकºयांपर्यंत पोहोचविणे व त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. तसेच कृषी विभागातील विविध नैसर्गिक आपत्तींचे सर्वेक्षण करणाºया समितीचे कृषी सहायक हे सदस्य आहेत. शेतकºयांच्या सहली आयोजित करणे, शेतकरी मेळावा घेणे, पीक उत्पन्नांच्या दृष्टीने शेतकºयांना मार्गदर्शन करणे अशी कामेही त्यांना करावी लागतात. तरीही अशा कृषी सहायकांना गावपातळीवर कार्यालय नव्हते. त्यामुळे कामकाज करताना अडचणी निर्माण व्हायच्या.

शेतकरी सल्ला घेण्यासाठी, अडचणी मांडण्यासाठी आल्यास कृषी सहायक कोठे सापडतील, याचा नेम नसायचा. यासाठी आता शासनानेचे कृषी सहायकांना ग्रामस्तरांवर कार्यालयीन कामकाजासाठी जागा आणि फर्निचर उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाºयांना केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कृषी आयुक्तालयांच्या अधिपत्याखालील कृषी सहायकांना ग्रामपंचायत कार्यालयात किमान १५० ते २०० चौरस फूट जागा कार्यालयीन कागदपत्रे व कामकाजासाठी तत्काळ उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. तसेच ही जागा उपलब्ध झाल्यानंतर खुर्ची, टेबल, कपाट आदींची व्यवस्था कृषी आयुक्तालयाने करावी, असे स्पष्ट केले आहे. तर कृषी सहायकांना जागा मिळाली का ? याबाबतची खात्री करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाºयांवर देण्यात आली आहे.

यापुढे ग्रामपंचायतीतच कृषी सहायकांना कार्यालयासाठी जागा मिळणार असल्याने त्यांची उपलब्धता नेहमीच गावात राहणार आहे. त्यामुळे याचा फायदा शेतकºयांना अधिक प्रमाणात होईल. तसेच शेतकºयांचे प्रश्न, अडचणी त्वरित सुटण्यास मदत होणार आहे.शासनाच्या या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील सहायकांनाही कार्यालय मिळणार आहे.कार्यालयाबाहेर माहिती...कार्यालय झाल्यानंतर तेथे कृषी सहायकाचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, कामाचा दिवस आणि वेळ नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकºयांना कृषी सहायक वेळेत भेटतील. त्याचबरोबर बाहेर कोठे गेले असतील तर शेतकºयांना मोाबईलवरून माहिती घेता येणार आहे. परिणामी शेतकºयांचे हेलपाटेही टळतील. सातारा जिल्ह्यात कृषी सहायकांची ४४० पदे मंजूर असली तरी ४०४ जण कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या १४९६ आहे. या ठिकाणी कृषी सहायकांसाठी कार्यालय तयार करावे लागणार आहे. तर या सहायकांकडे पाच ते सहा गावांचा कार्यभार असतो.यापूर्वी कृषी सहायकांना कार्यालय नव्हते; पण आता त्यांना ग्रामपंचायत इमारतीत कार्यालयासाठी जागा मिळणार आहे. त्यामुळे सहायकांना शेतकºयांचे प्रश्न, अडचणी सोडविणे सोपे होईल. तसेच कृषी सहायक कधी आणि कोणत्या वेळी गावात उपलब्ध होतील, हेही शेतकºयांना समजणार आहे. - विजयकुमार राऊत, कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत