शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

मुगाच्या राशी झाल्या; भाव घसरले... हमीभाव अजूनही अधांतरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 15:26 IST

हमीभावाप्रमाणे शेतमालाची खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला खरा, मात्र प्रत्यक्षात अजूनही हमीभाव अधांतरी आहे.

- धर्मराज हल्लाळे

हमीभावाप्रमाणे शेतमालाची खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला खरा, मात्र प्रत्यक्षात अजूनही हमीभाव अधांतरी आहे. सध्या मुगाच्या राशी झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी बाजारात आणला आहे. परंतु हमीभावापेक्षा क्विंटलमागे 2000 रुपये कमी दरानेच विक्री होताना दिसत आहे. त्यामुळे हमीभावाच्या घोषणा बाजारगप्पाच राहिल्या आहेत.

मुगाला 6975 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु हमीभावाने खरेदी करणारे केंद्रच अस्तित्वात नाहीत. लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील मोठी बाजार समिती आहे. दररोज सुमारे 10 हजार क्विंटलपेक्षा अधिक मूग बाजारात विक्रीसाठी येत आहे. परंतु हमीभाव केंद्रच सुरू झालेले नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. यापूर्वी शेतमालाची खरेदी करण्यासाठी शासनाने व्यापाऱ्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. एकट्या लातूरच्या बाजार समितीत 28 कोटींपेक्षा उलाढाल ठप्प झाली होती. व्यापाऱ्यांना हमीभावाने खरेदी करणे परवडत नाही अन् त्यांनी तसे नाही केले तर कारवाई होणार या धास्तीने व्यवहारच बंद होता. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना पैसा हवा आहे. त्यामुळे ते पुन्हा कर्जबाजारी होतील, अशी स्थिती आहे. व्यापाऱ्यांकडून उसनवारी वाढली आहे. एकंदर हमीभाव केंद्र लवकरात लवकर सुरू होणे अपेक्षित आहे. अन्यथा कमी दराने का होईना, शेतमाल विकणे हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांपुढे राहिला आहे. 

सध्याच्या कायद्यामध्ये कारवाईची तरतूद नसल्याचे राज्याच्या पणन संचालकांनी कळविल्यानंतर बाजार सुरू झाला. मुगाची आवक वाढली. मात्र भाव घसरला. जिथे हमीभाव 6900 आहे तिथे शेतकऱ्यांच्या पदरी 4800 रुपये मिळत आहे. शासनाच्या प्रस्तावित निर्णयामुळे 11 दिवस बंद राहिलेला बाजार त्यानंतर बाजारात झालेली घसरण शेतकऱ्यांच्या मुळावर आहे. अजून उडीद, सोयाबीन यायचे आहे. त्यांच्याही हमीभावाचे आकडे शासकीय दफ्तरीच राहतील की काय, अशी स्थिती आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नाफेडच्या अधिकाऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु एकही केंद्र सुरू झालेले नाही. शेतकऱ्यांचा बैलपोळा उसनवारीवर झाला. येणाऱ्या महिनाभरातील सणही हमीभावाची प्रतीक्षा करण्यात जाऊ नये यासाठी गरज असलेला शेतकरी मिळेल त्या भावाने शेतमाल विक्री करीत आहे. एकीकडे शासन दुप्पट उत्पन्नाच्या जवळही शेतकऱ्यांना घेऊन जाऊ शकले नाही. उलट हक्काचा हमीभावही मिळू शकत नाही. पावसाने दिलेल्या ताणामुळे शेतकरी कायम चिंतेत आहे. एकतर पिकतच नाही अशी स्थिती, पिकले तर घसरलेला भाव माथी मारला जातो. अशा विचित्र कोंडीतून शेतकऱ्यांची काही केल्या सुटका होत नाही. निदान शासनाने तातडीने हालचाली करून हमीभाव केंद्र उभारले तर बळीराजाला काही अंशी न्याय मिळेल.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र