शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदा हवा; सेलिब्रिटी नको

By admin | Updated: July 9, 2017 00:03 IST

दहीहंडी उत्सवात जिवावर उदार होऊन, आपले कौशल्य दाखविणाऱ्या गोविंदांपेक्षा, आयोजकांकडून सेलिब्रिटींना अधिक महत्त्व दिले जाते. परिणामी, जखमी गोविंदांपेक्षा

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहीहंडी उत्सवात जिवावर उदार होऊन, आपले कौशल्य दाखविणाऱ्या गोविंदांपेक्षा, आयोजकांकडून सेलिब्रिटींना अधिक महत्त्व दिले जाते. परिणामी, जखमी गोविंदांपेक्षा कलाकार, गायकांच्या सुरक्षेसाठी तत्परता दाखविणाऱ्या आयोजकांना या वेळी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण अशा आयोजकांच्या दहीहंडीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीने दिला आहे.मुंबई मराठी पत्रकार संघ येथे शनिवारी समितीने ‘दहीहंडीचे आयोजन आणि आयोजक’ या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर या वेळी म्हणाले की, गोविंदासाठीची वयोमर्यादा व २० फुटांहून अधिक उंचीचे मानवी थर उभारण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा. दहीहंडी आता सण उरला नसून, काही आयोजकांनी या सणाला इव्हेंटचे स्वरूप दिले आहे. उत्सवात गोविंदाऐवजी सेलेब्रिटींना महत्त्व दिले जाते. गोविंदाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचबरोबर, या वेळी दहीहंडी पाहायला येणारे प्रेक्षक आयोजकांनी आयोजित केलेल्या बाजारू स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी गर्दी करतात. त्यामुळे दहीहंडी बांधलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीमुळे गोविंदांना पुरेशी जागा मिळत नाही. त्यांना दहीहंडी फोडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेकदा गोविंदांची भंबेरी उडते. मनोरा रचताना गोविंदा गोंधळतात व खाली पडून जखमी होतात. त्यामुळे अशा आयोजकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा समितीने दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. समन्वय समितीच्या इशाऱ्यामुळे उत्सवात नेमके काय होणार, याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील गोविंदांच्या या विषयाचे समर्थन केले आहे. शिवाय अशा आयोजकांकडे हंडी फोडण्यासाठी जाऊ नये, असेही आवाहन राज यांनी केले आहे, असे पडेलकर यांनी सांगितले. या प्रसंगी समन्वय समितीचे उपाध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, कार्याध्यक्ष अरुण पाटील व सचिव गीता झगडे उपस्थित होते.मंडळे दिवाळखोरगेल्या तीन-चार वर्षांमध्ये दहीहंडी आयोजकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. अनेक ठिकाणी दहीहंडीची रक्कम कमी करण्यात आली आहे. आयोजक उत्सवापेक्षा सेलेब्रिटींना जास्त महत्त्व देत असल्यामुळे, गोविंदांना एका दिवसात जास्त दहीहंड्या फोडता येत नाहीत. त्यामुळे अनेक मंडळे दिवाळखोर झाली आहेत. महिला गोविंदासोबत गैरवर्तणूक नकोदहीहंडीदरम्यान मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, अशा कार्यक्रमांचा दर्जा सुमार असतो. येथील प्रेक्षकही सुमार असतात. येथील प्रेक्षकांकडून महिला गोविंदाबाबत शेरेबाजीकेली जाते, असेही समितीने सांगितले.संस्कृती प्रतिबिंबित करादहीहंडीच्या वेळी महाराष्ट्राची संस्कृती प्रतिबिंबित करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांनी करावे, अशी सूचनाही समितीने केली. कार्यक्रमात डीजे नसावा, असेही समितीने सांगितले.गोविंदाच सेलिब्रिटी : दहीहंडी हा उत्सव गोविंदांचा असला, तरी दहीहंडीच्या कार्यक्रमात आयोजक भाड्याने अनेक सेलिब्रिटी आणतात. त्यामुळे आयोजक आणि प्रेक्षकांकडून उत्सव मूर्ती असलेल्या गोविंदांकडे, त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते, परंतु या उत्सवाच्या दिवशी गोविंदाच खरा सेलिब्रिटी असल्यामुळे, त्याला सेलेब्रिटीसारखी वागणूक मिळायला हवी, अशीही आशा समितीने व्यक्त केली.आज सरावाला सुरुवातगुरुपौर्णिमेचे औचित्य साधत, मुंबई शहर आणि उपनगरातील गोविंदा पथकाकडून रविवारपासून सरावाचा श्रीगणेशा केला जाईल. सुमारे दोनशे मंडळे गुरुपौर्णिमेचे निमित्त साधत, सरावाला आरंभ करतात. हा सराव महिनाभर चालतो, असे समितीने सांगितले.