शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीवरून सरकारची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:12 IST

शेतकरी कर्जमाफी, तूर खरेदीतील घोटाळा, एसआरए प्रकल्पाच्या मुंजुरीतील अनियमितता आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरून सोमवारपासून सुरु होणा-या विधिमंडळाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफी, तूर खरेदीतील घोटाळा, एसआरए प्रकल्पाच्या मुंजुरीतील अनियमितता आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरून सोमवारपासून सुरु होणा-या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरणार असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या स्वतंत्र पत्रकार परिषद सांगितले.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॉंग्रेस-राष्ट्रवादीत बेबनाव झाला असला तरी प्रत्यक्ष अधिवेशन काळात विविध मुद्यांवरून दोन्ही पक्षाचे नेते सरकारवर तूटून पडणार आहेत. शेतक-यांची फसवणूक, एसआरए प्रकल्पातील गैरव्यवहार, शिक्षणाचा उडालेला बोजवारा, कुपोषणाची समस्या आदी मुद्यावर सरकारला जाब विचारु, असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. एकीकडे कर्जमाफीवरुन शेतक-यांची फसवणूक केली जात आहे. तर, दुसरीकडे राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी एका विकासकावर केलेली कृपादृष्टी कागदपत्रांसह समोर आली आहे. सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे दिसून येते. या प्रकरणाला मुख्यमंत्र्यांची मान्यता असल्याचे गृहनिर्माण मंत्र्यांनी नमूद केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनीच स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. या घोटाळ्यातही मुख्यमंत्री संबंधितांना क्लीन चीट देणार की कारवाई करणार, असा प्रश्न विखे पाटील यांनी केला. याप्रसंगी सपाचे अबु आझमी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे आमदार जोगेंद्र कवाडे, जनता दलाचे आमदार कपिल पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, विजय वडेट्टीवार, आदी उपस्थित होते. सरकारचा कारभार गोल, गोल...!शेतक-यांची सरसकट कर्जमाफी, शेतीमालालला हमीभाव, नेवाळे येथील शेतकरी आंदोलनात पॅलेट गनचा वापर आदी प्रश्नावर सरकारला धारेवर धरू, असे सांगत ‘राज्य सरकारचा सगळा कारभार गोल, गोल आहे. त्यात मोठा झोल आहे. त्यामुळे सरकारवर जनतेचा भरोसा राहिला नाही’, अशी टीका धनंजय मुंढे यांनी केली. यावेळी सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते. अद्याप एकही शेतकरीला कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही पण जाहीरातबाजीवर ३६ लाख रूपये खर्च करण्यात आले. कर्जमाफीबाबत जिल्हानिहाय आकडेवारी जाहीर करण्याची सरकारची तयारी नाही. कर्जमाफीसाठी निधीची तरतूद कशी करणार याबाबत काहीच स्पष्टता नाही. तूर खरेदीत घोटाळा झाल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मान्य केले आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली.शिवसेनेवर निशाणाशिवसेना आता ढोल वाजवते पण आता शिवसेनेसमोर ढोल वाजवायची वेळ आली. शेतक-यांचा इतकाच कळवळा असेल तर मुंबई महापालिकेच्या ज्या ठेवी आहेत त्यापैकी ३० हजार कोटी शिवसेनेने द्यावेत, अशी मागणी मुंडे यांनी केली. तर, ज्या तत्परतेने मनपाचे अधिकारी मलिष्काच्या घरी तपासणीसाठी पोहोचले, तितक्यात तत्परतेने कधी मातोश्रीवर गेले आहेत का, अशी विचारणा विखे-पाटील यांनी केली. आता शिवसेनाही एक एफएम रेडिओ बनली आहे. ‘शिवसेनेच्या मेंदूत झोल-झोल आहे; म्हणूनच त्यांची भूमिका गोल-गोल आहे’ असा टोलाही विखे पाटील यांनी लगावला.