शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

कर्जमाफीवरून सरकारची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:12 IST

शेतकरी कर्जमाफी, तूर खरेदीतील घोटाळा, एसआरए प्रकल्पाच्या मुंजुरीतील अनियमितता आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरून सोमवारपासून सुरु होणा-या विधिमंडळाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफी, तूर खरेदीतील घोटाळा, एसआरए प्रकल्पाच्या मुंजुरीतील अनियमितता आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरून सोमवारपासून सुरु होणा-या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरणार असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या स्वतंत्र पत्रकार परिषद सांगितले.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॉंग्रेस-राष्ट्रवादीत बेबनाव झाला असला तरी प्रत्यक्ष अधिवेशन काळात विविध मुद्यांवरून दोन्ही पक्षाचे नेते सरकारवर तूटून पडणार आहेत. शेतक-यांची फसवणूक, एसआरए प्रकल्पातील गैरव्यवहार, शिक्षणाचा उडालेला बोजवारा, कुपोषणाची समस्या आदी मुद्यावर सरकारला जाब विचारु, असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. एकीकडे कर्जमाफीवरुन शेतक-यांची फसवणूक केली जात आहे. तर, दुसरीकडे राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी एका विकासकावर केलेली कृपादृष्टी कागदपत्रांसह समोर आली आहे. सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे दिसून येते. या प्रकरणाला मुख्यमंत्र्यांची मान्यता असल्याचे गृहनिर्माण मंत्र्यांनी नमूद केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनीच स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. या घोटाळ्यातही मुख्यमंत्री संबंधितांना क्लीन चीट देणार की कारवाई करणार, असा प्रश्न विखे पाटील यांनी केला. याप्रसंगी सपाचे अबु आझमी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे आमदार जोगेंद्र कवाडे, जनता दलाचे आमदार कपिल पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, विजय वडेट्टीवार, आदी उपस्थित होते. सरकारचा कारभार गोल, गोल...!शेतक-यांची सरसकट कर्जमाफी, शेतीमालालला हमीभाव, नेवाळे येथील शेतकरी आंदोलनात पॅलेट गनचा वापर आदी प्रश्नावर सरकारला धारेवर धरू, असे सांगत ‘राज्य सरकारचा सगळा कारभार गोल, गोल आहे. त्यात मोठा झोल आहे. त्यामुळे सरकारवर जनतेचा भरोसा राहिला नाही’, अशी टीका धनंजय मुंढे यांनी केली. यावेळी सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते. अद्याप एकही शेतकरीला कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही पण जाहीरातबाजीवर ३६ लाख रूपये खर्च करण्यात आले. कर्जमाफीबाबत जिल्हानिहाय आकडेवारी जाहीर करण्याची सरकारची तयारी नाही. कर्जमाफीसाठी निधीची तरतूद कशी करणार याबाबत काहीच स्पष्टता नाही. तूर खरेदीत घोटाळा झाल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मान्य केले आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली.शिवसेनेवर निशाणाशिवसेना आता ढोल वाजवते पण आता शिवसेनेसमोर ढोल वाजवायची वेळ आली. शेतक-यांचा इतकाच कळवळा असेल तर मुंबई महापालिकेच्या ज्या ठेवी आहेत त्यापैकी ३० हजार कोटी शिवसेनेने द्यावेत, अशी मागणी मुंडे यांनी केली. तर, ज्या तत्परतेने मनपाचे अधिकारी मलिष्काच्या घरी तपासणीसाठी पोहोचले, तितक्यात तत्परतेने कधी मातोश्रीवर गेले आहेत का, अशी विचारणा विखे-पाटील यांनी केली. आता शिवसेनाही एक एफएम रेडिओ बनली आहे. ‘शिवसेनेच्या मेंदूत झोल-झोल आहे; म्हणूनच त्यांची भूमिका गोल-गोल आहे’ असा टोलाही विखे पाटील यांनी लगावला.