शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

रिक्षा-टॅक्सी, खासगी बसेस व टेम्पोचालक वाहतूक संघटनेला सरकारने मदत द्यावी; राष्ट्रवादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:52 IST

कोरोनामुळे आता परिस्थिती बिकट झाली असून दैनंदिन जीवन कशा पद्धतीने चालणार पुढील एकवीस दिवस कसे चालवणार हा खरा प्रश्न आहे.

मुंबई: मुंबई राज्याची ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबई शहरात जवळपास दोन कोटी इतकी लोकसंख्या मुंबई महानगरीत राहते. संपूर्ण देश व मुंबई लॉक डाउन करणे म्हणजे दोन कोटी लोकसंख्येला घरी थांबायला लावणे. कोरोनामुळे हा निर्णय सरकारला घ्यावा लागला. मुंबई शहरामध्ये 35000 काळीपिवळी टॅक्सी, 65000 खाजगी एसी टॅक्सी हे सर्व बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच खासगी बसेस टेम्पो वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे.या सर्व वाहतूक दारांचे हातावर पोट असल्यामुळे दिवसभर धंदा केला तर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो. कोरोनामुळे आता परिस्थिती बिकट झाली असून दैनंदिन जीवन कशा पद्धतीने चालणार पुढील एकवीस दिवस कसे चालवणार हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी, खासगी बसेस व टेम्पो चालक वाहतूक संघटनेला राज्य सरकारने मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते अँड.अमोल मातेले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका ईमेलद्वारे पत्र पाठवून  केली आहे.

दिवसभर मुंबई शहरांत टॅक्सी, रिक्षा, टेम्पो चालक मालक व खासगी बसेस यांनी जर काही काम धंदा केला तरच त्यांच्या घरची चूल पेटवू शकते. या सर्व लोकांचे हातावर पोट असल्यासारखी एकंदरीत परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत वाहनांचे बँकेचे कर्ज असते त्याच बरोबर इतर काही खर्च असतात. तरी यासाठी राज्य सरकारने काहीतरी उपाययोजना करून रिक्षा-टॅक्सी, खासगी बसेस व टेम्पो चालकांचे दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका त्यांनी लोकमतकडे विषद केली.