शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रिक्षा-टॅक्सी, खासगी बसेस व टेम्पोचालक वाहतूक संघटनेला सरकारने मदत द्यावी; राष्ट्रवादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:52 IST

कोरोनामुळे आता परिस्थिती बिकट झाली असून दैनंदिन जीवन कशा पद्धतीने चालणार पुढील एकवीस दिवस कसे चालवणार हा खरा प्रश्न आहे.

मुंबई: मुंबई राज्याची ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबई शहरात जवळपास दोन कोटी इतकी लोकसंख्या मुंबई महानगरीत राहते. संपूर्ण देश व मुंबई लॉक डाउन करणे म्हणजे दोन कोटी लोकसंख्येला घरी थांबायला लावणे. कोरोनामुळे हा निर्णय सरकारला घ्यावा लागला. मुंबई शहरामध्ये 35000 काळीपिवळी टॅक्सी, 65000 खाजगी एसी टॅक्सी हे सर्व बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच खासगी बसेस टेम्पो वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे.या सर्व वाहतूक दारांचे हातावर पोट असल्यामुळे दिवसभर धंदा केला तर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो. कोरोनामुळे आता परिस्थिती बिकट झाली असून दैनंदिन जीवन कशा पद्धतीने चालणार पुढील एकवीस दिवस कसे चालवणार हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी, खासगी बसेस व टेम्पो चालक वाहतूक संघटनेला राज्य सरकारने मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते अँड.अमोल मातेले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका ईमेलद्वारे पत्र पाठवून  केली आहे.

दिवसभर मुंबई शहरांत टॅक्सी, रिक्षा, टेम्पो चालक मालक व खासगी बसेस यांनी जर काही काम धंदा केला तरच त्यांच्या घरची चूल पेटवू शकते. या सर्व लोकांचे हातावर पोट असल्यासारखी एकंदरीत परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत वाहनांचे बँकेचे कर्ज असते त्याच बरोबर इतर काही खर्च असतात. तरी यासाठी राज्य सरकारने काहीतरी उपाययोजना करून रिक्षा-टॅक्सी, खासगी बसेस व टेम्पो चालकांचे दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका त्यांनी लोकमतकडे विषद केली.