शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर; जालन्यातील लाठीचार्जवर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 22:02 IST

'काही पक्षांचे कार्यकर्ते हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना विनंती करतो, कायदा हातात घेऊ नका.'

जालना- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार आणि बळाचा वापर झाल्यानंतर मोठा संघर्ष झाला. यावेळी आंदोलकांनीही दगडफेक केली, ज्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. या लाठीचार्जच्या घटनेवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'जालन्यातील घटना दुर्देवी आणि गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: उपोषणकर्त्यांशी बोलले होते. आमचा विविध प्रकारे त्यांच्याशी संवाद सुरी होता. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरपणे काम करत आहे. पण हा विषय न्यायालयाशी संबंधित विषय आहे, तो एका दिवसात सुटणार नाही. आम्ही त्यांची समजूत काढत होतो, पण ते ऐकत नव्हते.'

'काही उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत चालली होती, ही राज्याची जबबादारी आहे की, अशाप्रकारे उपोषण होत असेल आणि त्यात तब्येत खबार होत असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे. प्रशासन कालही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले होते, पण त्यांनी ऐकले नाही. प्रशासन आज पुन्हा गेले पण दगडफेक करण्यात आली. 12 पोलीस जखमी झाले, त्यानंतर तिथे लाठीचार्ज करण्यात आला', अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस पुढे म्हणाले, 'लाठीचार्जमध्ये कुणी जखमी होऊ नये यासाठी प्रयत्न केला गेला. लाठीचार्ज कमी झाला, अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तशाप्रकारची कारवाई केली नसती, तर पोलीस पथकाला अतिशय वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते. राज्य सरकार या विषयी अतिशय संवेदनशील आहे. आम्ही मराठा समजाला आरक्षणाला दिले होते, पण नंतर सर्वोच्च न्यायालयात आरक्षण का टिकले नाही, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर असल्यामुळे कायदा कुणीही हातात घेऊ नये', असे आवाहनदेखील फडणवीसांनी केले.

काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मराठा समन्वयकाच्या नावाने हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना विनंती आहे की, अशाप्रकारच्या गोष्टी करू नका, हे योग्य नाही. हा काय राजकीय प्रश्न नाही, समाजाचा प्रश्न आहे. समाजाच्या प्रश्नासाठी तुम्ही एकत्र येऊ शकत नसाल, तर तुमच्या मनात समाजाबद्दल कुठलही प्रेम नाही, असं दिसून येईल. आम्ही निश्चितच यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाPoliceपोलिस