शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादकांना सरकारकडून दिलासा; प्रति ३५० रुपये क्विंटल अनुदान जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 17:05 IST

परराज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू राहणार नाही.

मुंबई - गेल्या महिन्याभरापासून कांदा उत्पादकांचा प्रश्न चिघळला आहे. कांद्याला भाव मिळत नाही अशी अवस्था झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला. विरोधकांनी या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ घातला तेव्हा सरकारने कांद्याची बाजारभावातील घसरण आणि उपाययोजना यासाठी समिती गठीत केली होती. या समितीने दिलेल्या रिपोर्टनुसार सरकारने कांद्याला प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचं जाहीर केले आहे. याबाबतचं परिपत्रक काढण्यात आले असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

सरकारने १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालवधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी अनुदान मंजूर केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी लाल कांदा १ फेब्रुवारी ते ३१ मार्च कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समिती आणि नाफेडकडे विक्री केली असेल त्यांच्यासाठी ही योजना आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबवण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटलं. 

तसेच परराज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू राहणार नाही. सरकारकडून मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केले जाईल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हे अनुदान मिळवण्यासाठी कांदा विक्री पट्टी, विक्री पावती, ७/१२ उतारा, बँक बचत खाते क्रमांक इ साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलीय तिथे अर्ज करावा असं आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी