शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

दुष्काळावरून सरकाराचे राजकारण, विरोधकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 04:44 IST

तुमच्या काळात दुष्काळाच्या नावाखाली सरकारी निधीवर डल्ला मारला गेल्यानेच यंदा कडक नियम करावे लागल्याचा प्रतिहल्ला सत्ताधाऱ्यांनी केला.

मुंबई : दुष्काळी उपायोजनेच्या मुद्दयावरून मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोप झाले. १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ पडलेला असताना सरकार दुष्काळी उपाययोजनेतही राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, तुमच्या काळात दुष्काळाच्या नावाखाली सरकारी निधीवर डल्ला मारला गेल्यानेच यंदा कडक नियम करावे लागल्याचा प्रतिहल्ला सत्ताधाऱ्यांनी केला.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या, असा तारांकीत प्रश्न काँग्रेस गटनेचे शरद रणपिसे यांनी उपस्थित केला. सरकारने सर्व प्रकारचे काटेकोर नियोजन केले. राखीव पाणीसाठा असल्यामुळे पाणीटंचाई तीव्र होणार नाही याबद्दल सरकार गंभीर आहे, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. दरम्यान, दुष्काळाबाबत सर्वपक्षीय सदस्यांचे प्रश्न, सूचना सभागृहनेत्यांना द्या. दुष्काळ निवारणाबाबतची यंत्रणा विविध स्तरावर राबवली तर दुष्काळावर मात करणे सोपे जाईल अशी सूचना सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली. तर, दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचे पुढच्या वर्गातल्या प्रवेश शुल्क माफ करण्याची मागणी काही सदस्यांनी केली. यावर विचार करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूबछावण्यांबाबत सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावर, सरकारने कोणताही दुजाभाव केला नाही, आघाडी सरकारच्या काळात ज्या पद्धतीने चारा छावण्यांमध्ये गैरप्रकार झाले ते रोखण्यासाठी कठोर नियम केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. तर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकार दुष्काळावर मात करण्यासाठी पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचा आरोप केला. आरोपप्रत्यारोपामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

टॅग्स :droughtदुष्काळ