शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

दुष्काळावरून सरकाराचे राजकारण, विरोधकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 04:44 IST

तुमच्या काळात दुष्काळाच्या नावाखाली सरकारी निधीवर डल्ला मारला गेल्यानेच यंदा कडक नियम करावे लागल्याचा प्रतिहल्ला सत्ताधाऱ्यांनी केला.

मुंबई : दुष्काळी उपायोजनेच्या मुद्दयावरून मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोप झाले. १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ पडलेला असताना सरकार दुष्काळी उपाययोजनेतही राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, तुमच्या काळात दुष्काळाच्या नावाखाली सरकारी निधीवर डल्ला मारला गेल्यानेच यंदा कडक नियम करावे लागल्याचा प्रतिहल्ला सत्ताधाऱ्यांनी केला.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या, असा तारांकीत प्रश्न काँग्रेस गटनेचे शरद रणपिसे यांनी उपस्थित केला. सरकारने सर्व प्रकारचे काटेकोर नियोजन केले. राखीव पाणीसाठा असल्यामुळे पाणीटंचाई तीव्र होणार नाही याबद्दल सरकार गंभीर आहे, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. दरम्यान, दुष्काळाबाबत सर्वपक्षीय सदस्यांचे प्रश्न, सूचना सभागृहनेत्यांना द्या. दुष्काळ निवारणाबाबतची यंत्रणा विविध स्तरावर राबवली तर दुष्काळावर मात करणे सोपे जाईल अशी सूचना सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली. तर, दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचे पुढच्या वर्गातल्या प्रवेश शुल्क माफ करण्याची मागणी काही सदस्यांनी केली. यावर विचार करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूबछावण्यांबाबत सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावर, सरकारने कोणताही दुजाभाव केला नाही, आघाडी सरकारच्या काळात ज्या पद्धतीने चारा छावण्यांमध्ये गैरप्रकार झाले ते रोखण्यासाठी कठोर नियम केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. तर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकार दुष्काळावर मात करण्यासाठी पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचा आरोप केला. आरोपप्रत्यारोपामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

टॅग्स :droughtदुष्काळ