शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सरकारची जमीन सरकारलाच विकली; नॅशनल हायवेसाठी पुन्हा केले भूसंपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 6:19 AM

शासकीय कामांसाठी सरकारने पूर्वी संपादित केलेली जमीन पुन्हा सरकारलाच विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

- विकास राऊत औरंगाबाद : शासकीय कामांसाठी सरकारने पूर्वी संपादित केलेली जमीन पुन्हा सरकारलाच विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. औरंगाबाद शहरानजीक असलेल्या तीसगाव शिवारात हा प्रकार घडला आहे.तीसगाव येथील गट नं. २१६ मधील १३ हेक्टर ५३ आर क्षेत्रातील बहुतांश जमीन सरकारने विविध कामांसाठी संपादित केलेली आहे. मात्र, तीच जमीन पुन्हा नॅशनल हायवे क्र. २११च्या भूसंपादनात सरकारलाच विकण्यात आली आहे.तीसगाव गट नं. २१६ मधील दीड हेक्टर जमिनीचे संपादन २००७ मध्येच झाले. मात्र, २००१ पासून २०१६ पर्यंत मालकीहक्काच्या नोंदींमध्ये फेरफार करून हीच जमीन पुन्हा राष्टÑीय महामार्गसाठी सरकारला विकण्यात आली. या संदर्भात तहसीलदारांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या दुहेरी भूसंपादनावर शिक्कामोर्तब झाले. चौकशीची फाइल जिल्हाधिकारी स्तरावर असून, या प्रकरणी संबंधितांवर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.>भूसंपादनात मोठ्या प्रमाणात अफरातफरसमृद्धी महामार्ग आणि राष्टÑीय महामार्ग (एनएच-२११) मधील भूसंपादनात मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याचे दिसून येते. लोकप्रतिनिधी, तलाठी, मंडळ अधिकारी आणि उपविभागीय अधिकाºयांनी मिळून हा सगळा ‘डबलगेम’ केला असण्याची शक्यता आहे.