शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

नवीन भरती करणार नसल्याचे शासनानेच कोर्टात सांगितले; खा. उदयनराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 06:20 IST

तामिळनाडूत मद्रास उच्च न्यायालयाने ६९ टक्के आरक्षण रद्द केले होते. तरीही तेथील सरकारने एक दिवसही आरक्षणाला स्थगिती दिली नाही. सर्व पक्षांच्या एकजुटीने आरक्षण तेथे टिकले. तशीच एकजूट महाराष्ट्रात व्हावी, यासाठी पुढाकार घेण्याची माझी तयारी आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाचा निकाल येईपर्यंत नवीन भरती करणार नाही, असे राज्य शासनाने सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली, असा दावा भाजपचे राज्यसभासदस्य छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.या पत्रात उदयनराजे यांनी, अंतरिम स्थगितीचा आदेश येताच घाईघाईने शैक्षणिक प्रवेशास स्थगिती देण्याचा सरकारचा नेमका हेतू काय होता, असा सवाल केला आहे. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा लढा एकजुटीने लढल्यामुळे यश मिळाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात सरकारी वकिलांमध्ये बेबनाव होता का, याबाबत समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर सरकारने खुलासा करावा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.तामिळनाडूत मद्रास उच्च न्यायालयाने ६९ टक्के आरक्षण रद्द केले होते. तरीही तेथील सरकारने एक दिवसही आरक्षणाला स्थगिती दिली नाही. सर्व पक्षांच्या एकजुटीने आरक्षण तेथे टिकले. तशीच एकजूट महाराष्ट्रात व्हावी, यासाठी पुढाकार घेण्याची माझी तयारी आहे.उदयनराजेंचे सरकारला प्रश्न1. राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली का?2. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत आरक्षण कायम का ठेवत नाही?3. मराठा क्रांती मोर्चा आंदोलनादरम्यानच्या गंभीर गुन्ह्यांची वेगळी चौकशी करा, पण त्या व्यतिरिक्तचे गुन्हे तत्काळ मागे घेणार का?4. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय नेते, आमदार, खासदारांची संयुक्त बैठक बोलाविणार का?

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण