शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘ओबीसीच्या यादीतून एखाद्या समाजाला वगळण्याचा अधिकारही सरकारला आहे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 06:23 IST

सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणामुळे एखाद्या समाजाला इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) अंतर्गत सरकार आरक्षण देत असेल तर त्या समाजाची प्रगती झाल्यानंतर त्या समाजाला ‘ओबीसी’च्या यादीतून वगळण्याचा अधिकारही राज्य सरकारला आहे.

मुंबई : सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणामुळे एखाद्या समाजाला इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) अंतर्गत सरकार आरक्षण देत असेल तर त्या समाजाची प्रगती झाल्यानंतर त्या समाजाला ‘ओबीसी’च्या यादीतून वगळण्याचा अधिकारही राज्य सरकारला आहे. मात्र, आपल्याकडे असे क्वचितच घडते. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण देणे भाग पडत आहे. परंतु, भविष्यात ही स्थिती बदलेल. राज्य सरकार ओबीसीमध्ये समाविष्ट असलेल्या समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेऊन ५० टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक आरक्षण देण्याची नामुष्की ओढावून घेणार नाही, अशी आशा आम्ही करत आहोत, असे निरीक्षण उच्च न्यायालयानेमराठा आरक्षण वैध ठरवताना नोंदविले.न्या. एम. जी गायकवाड समितीने मराठा समाज समाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे दाखवत ही अपवादात्मक स्थिती असल्याचे अहवालात म्हटले आहे. गायकवाड समितीचा अहवाल स्वीकारत राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मराठा आरक्षण वैध ठरविताना उच्च न्यायालयाने वर्षानुवर्षे ओबीसींच्या यादीत वाढ होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मागास प्रवर्गाची नियुक्ती केली. स्वत:ला मागास म्हणवून घेणाऱ्या समाजाचा सखोल अभ्यास करून त्या समाजाला आरक्षण देणे योग्य आहे की नाही, याबाबत हा आयोग निर्णय घेतो. त्याचप्रमाणे एखाद्या मागास समाजाची प्रगती झाली असल्यास त्याचा अभ्यास करून त्या समाजाला ओबीसीच्या यादीतून वगळण्याबाबतही आयोग निर्णय घेऊ शकतो.सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी घटनाकारांनी आरक्षणाची तरतूद केली आहे. त्याचबरोबर समान प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी, हाही आरक्षण देण्यामागे उद्देश होता. मात्र, त्याचा विचार करण्यात आला नाही. राज्य सरकारला ओबीसीमधील यादीचा पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे, असे उच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.दर १० वर्षांनी आरक्षण दिलेल्या समाजाचा बदलता सामाजिक व आर्थिक स्तर अभ्यासून राज्य सरकारने त्या समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे की नाही, हे पाहून त्या समाजाचे आरक्षण काढण्याबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे. यामुळे राज्य सरकार ५० टक्क्यांची मर्यादा पाळू शकेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार