शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 13:54 IST

संजय राऊतांचे अस्तित्व संपले, एकही विधान असं दाखवा जे खरे ठरलेय, राऊत जे बोलतो ते होत नाही. महायुती प्रचंड मताने जास्त जागा विजयी होणार आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

मुंबई - १९९९ साली राज्यात भाजपा-शिवसेना युतीचं सरकार आलं असतं, परंतु मुख्यमंत्रि‍पदाच्या वादातून ती सत्ता गेली. मुख्यमंत्रि‍पदाची लालसा तेव्हाही त्यांच्या मनात होती. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा त्याला विरोध होता असं विधान शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. 

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या एकमेकांमधील सुसंवादामुळे १९९५ ची सत्ता चालली, परंतु ९९ ला आपल्या हाती सत्ता येतेय, परंतु मुख्यमंत्री कोण या वादातून आलेली सत्ता गमावली. कदाचित गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते ते उद्धव ठाकरेंना सहन झालं नव्हते. मुंडेना मुख्यमंत्री करा असं अनेक आमदारांनी सांगितले होते. परंत तेव्हाही यांच्या मनात मुख्यमंत्री आपण झालं पाहिजे ही लालसा होती. याला शिवसेनाप्रमुखांचा विरोध होता. अपक्ष आमदारांची जुळवाजुळव ही गोपीनाथ मुंडे यांनी केली. मनोहर जोशी, नारायण राणे यांनीही आमदारांची जुळवाजुळव प्रयत्न केला, त्याला छेद उद्धव ठाकरेंना दिला असं त्यांनी म्हटलं. 

तर एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना सांभाळतात, संजय राऊत हे प्रत्येक मतदारसंघात वसूली करून मातोश्रीकडे पैसे घेऊन जातायेत. हे कुठल्याही उमेदवाराला विचारले तरी ते सांगतील. तुम्ही इनकमिंगवाले, आम्ही आऊटगोईंगवाले आहोत. कार्यकर्त्यांना मदत करण्याऐवजी त्याचे खच्चीकरण करण्याचं काम केले जाते. संजय राऊतांचे अस्तित्व संपले, एकही विधान असं दाखवा जे खरे ठरलेय, राऊत जे बोलतो ते होत नाही. महायुती प्रचंड मताने जास्त जागा विजयी होणार आहे. मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले तीच भूमिका आमची आहे. मविआचे जे नेते औरंगजेबाचा उदोउदो करतायेत त्यांचा कळस कापण्याची ही वेळ आहे. महायुती मविआच्या या प्रकाराला उत्तर देईल असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर लगावला. 

दरम्यान, सुपारीबहाद्दर लोकांनी राजकारणावर बोलू नये. देवेंद्र फडणवीसांना जे राजकारणात स्थान आहे त्यावर बिनडोक संजय राऊतांनी बोलू नये. पक्ष मजबूत कसा करतायेत हे फडणवीसांकडे बघून कळते. पक्षाची इज्जत कशी घालवायची हे तुमच्याकडे बघून कळते. इज्जत घालवणाऱ्या माणसाने अशी वक्तव्ये करणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात आहेत. १७ तारखेला मविआ नेत्यांची अखेरची घरघर संपेल असं सांगत शिरसाटांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. 

न्यायालयावर अविश्वास दाखवणं म्हणजे हे लोकशाही मानत नाहीत 

सुप्रीम कोर्टावर दबाव मग केजरीवालांना जामीन कसा मिळाली? जामिनावर बाहेर आल्यावर ते सत्तेविरोधातच बोलत आहेत. लोकशाहीवर विश्वास न ठेवणारे हे लोक आहेत. केजरीवाल जामिनावर बाहेर आले. राजकारण हा भाग वेगळा आहे. न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नाही. न्यायालयावर अविश्वास दाखवणे म्हणजे तुम्ही या लोकशाहीला मानत नाही हे होते असा टोला शिरसाट यांनी विरोधकांना लगावला. 

एकनाथ शिंदे कार्यकर्ता जपणारा माणूस 

कार्यकर्त्यांना कसं जपायचं हे शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवलं, त्यामुळे नाशिकच नव्हे तर सर्वच मतदारसंघात मुख्यमंत्री गेले आहेत. प्रत्येक मतदारसंघात किमान २ वेळा ते गेलेत. सभा रद्द केल्या नाहीत. त्यांचीही तब्येत ठीक नसताना ते फिरतायेत. आमचा मुख्यमंत्री कार्यकर्ता जपतोय याचा आम्हाला अभिमान आहे असंही संजय शिरसाट यांनी सांगितले.  

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४