शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 13:54 IST

संजय राऊतांचे अस्तित्व संपले, एकही विधान असं दाखवा जे खरे ठरलेय, राऊत जे बोलतो ते होत नाही. महायुती प्रचंड मताने जास्त जागा विजयी होणार आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

मुंबई - १९९९ साली राज्यात भाजपा-शिवसेना युतीचं सरकार आलं असतं, परंतु मुख्यमंत्रि‍पदाच्या वादातून ती सत्ता गेली. मुख्यमंत्रि‍पदाची लालसा तेव्हाही त्यांच्या मनात होती. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा त्याला विरोध होता असं विधान शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. 

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या एकमेकांमधील सुसंवादामुळे १९९५ ची सत्ता चालली, परंतु ९९ ला आपल्या हाती सत्ता येतेय, परंतु मुख्यमंत्री कोण या वादातून आलेली सत्ता गमावली. कदाचित गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते ते उद्धव ठाकरेंना सहन झालं नव्हते. मुंडेना मुख्यमंत्री करा असं अनेक आमदारांनी सांगितले होते. परंत तेव्हाही यांच्या मनात मुख्यमंत्री आपण झालं पाहिजे ही लालसा होती. याला शिवसेनाप्रमुखांचा विरोध होता. अपक्ष आमदारांची जुळवाजुळव ही गोपीनाथ मुंडे यांनी केली. मनोहर जोशी, नारायण राणे यांनीही आमदारांची जुळवाजुळव प्रयत्न केला, त्याला छेद उद्धव ठाकरेंना दिला असं त्यांनी म्हटलं. 

तर एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना सांभाळतात, संजय राऊत हे प्रत्येक मतदारसंघात वसूली करून मातोश्रीकडे पैसे घेऊन जातायेत. हे कुठल्याही उमेदवाराला विचारले तरी ते सांगतील. तुम्ही इनकमिंगवाले, आम्ही आऊटगोईंगवाले आहोत. कार्यकर्त्यांना मदत करण्याऐवजी त्याचे खच्चीकरण करण्याचं काम केले जाते. संजय राऊतांचे अस्तित्व संपले, एकही विधान असं दाखवा जे खरे ठरलेय, राऊत जे बोलतो ते होत नाही. महायुती प्रचंड मताने जास्त जागा विजयी होणार आहे. मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले तीच भूमिका आमची आहे. मविआचे जे नेते औरंगजेबाचा उदोउदो करतायेत त्यांचा कळस कापण्याची ही वेळ आहे. महायुती मविआच्या या प्रकाराला उत्तर देईल असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर लगावला. 

दरम्यान, सुपारीबहाद्दर लोकांनी राजकारणावर बोलू नये. देवेंद्र फडणवीसांना जे राजकारणात स्थान आहे त्यावर बिनडोक संजय राऊतांनी बोलू नये. पक्ष मजबूत कसा करतायेत हे फडणवीसांकडे बघून कळते. पक्षाची इज्जत कशी घालवायची हे तुमच्याकडे बघून कळते. इज्जत घालवणाऱ्या माणसाने अशी वक्तव्ये करणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात आहेत. १७ तारखेला मविआ नेत्यांची अखेरची घरघर संपेल असं सांगत शिरसाटांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. 

न्यायालयावर अविश्वास दाखवणं म्हणजे हे लोकशाही मानत नाहीत 

सुप्रीम कोर्टावर दबाव मग केजरीवालांना जामीन कसा मिळाली? जामिनावर बाहेर आल्यावर ते सत्तेविरोधातच बोलत आहेत. लोकशाहीवर विश्वास न ठेवणारे हे लोक आहेत. केजरीवाल जामिनावर बाहेर आले. राजकारण हा भाग वेगळा आहे. न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नाही. न्यायालयावर अविश्वास दाखवणे म्हणजे तुम्ही या लोकशाहीला मानत नाही हे होते असा टोला शिरसाट यांनी विरोधकांना लगावला. 

एकनाथ शिंदे कार्यकर्ता जपणारा माणूस 

कार्यकर्त्यांना कसं जपायचं हे शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवलं, त्यामुळे नाशिकच नव्हे तर सर्वच मतदारसंघात मुख्यमंत्री गेले आहेत. प्रत्येक मतदारसंघात किमान २ वेळा ते गेलेत. सभा रद्द केल्या नाहीत. त्यांचीही तब्येत ठीक नसताना ते फिरतायेत. आमचा मुख्यमंत्री कार्यकर्ता जपतोय याचा आम्हाला अभिमान आहे असंही संजय शिरसाट यांनी सांगितले.  

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४