शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 08:59 IST

Gopichand Padalkar Jayant Patil Controversy: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांच्या विधानाने नव्या वादाने डोकं वर काढलं आहे. 

"प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना अशा प्रकारची विधाने करू नये. अशा प्रकारची वक्तव्ये ही वेदना देणारी असतात", अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकरांचे कान टोचले. 'वादग्रस्त विधानांसंदर्भात महायुतीचे धोरण ठरलेले आहे. भाजपच्या संदर्भातील जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. ते यावर बोलतील", अशी भूमिका अजित पवारांनी मांडली. 

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटलांवर टीका करताना पातळी सोडली. राजाराम पाटील, जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत पडळकरांनी टीका केली आहे. 

पडळकरांचं वादग्रस्त विधान काय?

गोपीचंद पडळकरांचा एका कार्यक्रमातील भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. "अरे जयंत पाटला, तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात धमक आहे, कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी मी औलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे?", असे विधान पडळकर यांनी जयंत पाटलांबद्दल केले. 

अजित पवार गोपीचंद पडळकरांच्या विधानावर काय बोलले?

नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, "गोपीचंद पडळकर यांनी काय विधान केलं, याची माहिती सध्या तरी माझ्याकडे नाही. पण, मी याच विचाराचा आहे की, कोणी कोणत्याही राजकीय विचारांचा असो... आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे. एक संस्कृती आहे."

"महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना अशा प्रकारची वक्तव्ये करू नये. अशी वक्तव्ये ही वेदना देणारी असतात", असे अजित पवारांनी सुनावले. 

"पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर फडणवीस बोलतील"

अजित पवार म्हणाले, "वादग्रस्त विधानांसंदर्भात आमच्या महायुती सरकारचं एकमेव धोरण आहे. महायुतीमधील तीनही पक्षाती ज्या लोकांनी विधान केलं आहे, त्या पक्षाच्या नेत्यांनी त्याची दखल घ्यावी आणि भूमिका मांडावी, असे आमचे धोरण ठरले आहे"

"शिवसेनेमधून काही वादग्रस्त विधान केले गेले, तर एकनाथ शिंदे बोलतील. माझ्या पक्षातून काही विधान आले तर त्याची जबाबदारी माझी आहे. भाजपच्या संदर्भात ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे", अशी भूमिका अजित पवारांनी मांडली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरJayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण