शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"हा फक्त ओबीसी आरक्षणावर घाला नाही तर..."; गोपीचंद पडळकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 18:28 IST

Gopichand Padalkar : ओबीसी एल्गार मेळाव्यात विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला धारेवर धरत मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली आहे.

अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला धारेवर धरत मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली आहे. "सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत काढलेली सूचना केवळ ओबीसींच्याच हक्कावर गदा आणत नाही तर एससी एसटीच्या आरक्षणावर घाला घालणार आहे" असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे. तसेच भीम सैनिकांना ओबीसींचा साथ देण्याचे आवाहनही केलं आहे. 

"रामोशी-बेरड, बेडर यात विवाह होतात. ते सगे सोयरे आहेत. काही अनुसुचित जातींमध्ये येतात तर काही महाराष्ट्रात भटके विमुक्तात येतात. पण सगळ्या रामोशी बांधवांना एससीचं सर्टिफिकेट देता येत नाही" असं पडळकर म्हणाले. तसेच "सगेसोयऱ्यांच्या तरतुदीतून संविधानाच्या मुलभूत ढाच्याला जेसीबी लावून उद्ध्वस्त केलं जातंय" असंही म्हटलं आहे. 

गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देखील याबाबत ट्विट केलं आहे. "सगेसोयऱ्यांच्या तरतुदीतून संविधानाच्या मुलभूत ढाच्याला जेसीबी लावून उद्ध्वस्त केलं जातंय. सजातीय विवाहाची बाब अधिसूचनेत नमुद करण्यात आलीये. जाती निर्मुलणासाठी आंतरजातीय विवाह महत्त्वाचे. हे माहिती असतानाही संविधानद्रोही निर्णय होतायेत. बोगस दाखल्यांना अधिकृत केलं जातंय" असं गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

"सगेसोयरे म्हणून खोटी प्रमाणपत्रे दिली जातायेत"

अहमदनगरच्या ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले की, "३६० कोटी रुपये देऊन खोटा रेकॉर्ड केला जात आहे. नोंदीमध्ये खाडाखोड केली जातेय. सगेसोयरे म्हणून खोटी प्रमाणपत्रे दिली जातायेत. हायकोर्टाचा निकाल आहे. त्यात न्यायाधीशांनी स्पष्ट म्हटलंय, सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली तर ओबीसींची आरक्षण संपून जाईल असं निकालात सांगितलं आहे. खोटी वंशावळ जुळवण्याचे प्रकार वाढणार आहेत. खोटे प्रमाणपत्र देऊन कुणबी दाखले देण्याचे प्रकार माझ्या हाती आलेत. झुंडशाहीने असं कुणी आरक्षण घेतले तर त्याला कोर्टात आव्हान देता येईल असं निकालपत्रात सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे असं त्यांनी सांगितले."

"मागासवर्गीय आयोगाचा सर्व्हे सुरू आहे तो सगळा खोटा आहे. घराघरी जातायेत, १८० प्रश्न आहेत. एका घराला दीड तास लागतो. तपासणी करणारे कधी २५, कधी ५० घरांची तपासणी केली सांगून टाकतात. त्यात केवळ जात विचारली जाते, बाकी सगळे आपोआप भरले जाते. बंगला असला तरी झोपडी, घराबाहेर गाड्या असल्या तरी काहीच नाही सांगितले जाते. ३ न्यायाधीश बसले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशापेक्षा डबल पैसे घेतात. गुलाल उधळला मग पुन्हा उपोषण कशाला, कोणासाठी या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?" असा घणाघात मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.  

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणAhmednagarअहमदनगर