शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राष्ट्र भगवं, पिवळं, पांढरं कसंही करा; पण नोकऱ्यांचं काय ? उदयनराजेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 14:10 IST

ज्यांचं पोट तळहातावर होतं, त्यांचा रोजगार बंद झाला. पाच वर्षांपूर्वी काही कमी जास्त असेल, पण त्यावेळी लोकांकडे रोजगार तरी होता. आता कसा रोजगार मिळवून देणार तुम्ही. ज्यांनी नवे घर घेतले, त्यांच्याकडे हप्ते भरायला पैसे नाहीच. सगळ विस्कळीत झाल्याचे उदयनराजे यांनी म्हटले.

मुंबई - पाच वर्षांपूर्वी देशात लोकशाही होती. त्यावेळी आपलं मत व्यक्त करण्याची मुभा होती. आताची स्थिती सर्वांनाच ठावूक आहे. ईडी, आयबी याचा धाक दाखवल्यामुळे कोणी काहीच बोलत नाही. ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्राला भगवं करा, पिवळं करा, हिरवं करा किंवा पांढरं करा, पण रोजगाराचं काही तरी पाहा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मोदी सरकारला लगावला. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ज्यांचं पोट तळहातावर होतं, त्यांचा रोजगार बंद झाला. पाच वर्षांपूर्वी काही कमी जास्त असेल, पण त्यावेळी लोकांकडे रोजगार तरी होता. आता कसा रोजगार मिळवून देणार तुम्ही. ज्यांनी नवे घर घेतले, त्यांच्याकडे हप्ते भरायला पैसे नाहीच. सगळ विस्कळीत झालं आहे. आगामी काळात बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय काढा. पाच वर्षांपूर्वी जागतीक पातळीवर मंदी असताना भारतीयांना झळ बसली नव्हती, याची आठवण यावेळी उदयनराजे यांनी करून दिली.

दरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली, त्यावर उदयनराजे म्हणाले की, पवार साहेब आणि त्यांचे पुतणे ते पाहुन घेईल. २०१४ मध्ये जनतेने भाजपला बहुमत दिले होते, त्यामुळे तुम्ही काय केलं हे दाखवून द्या. कुणावर वैयक्तीक टीका करण्याची गरज नाही, असा टोला उदयनराजे यांनी मोदींना लगावला. लोकांना दिलेले वचन पाळले की नाही, देशाची स्थिती काय आहे, ते तर सांगा. त्यानंतर लोकं ठरवतील तुम्हाला स्वीकारायचं की नाकारायचं, असं उदयनराजे यांनी सांगितले.

विरोधक आरोप करतात की, आमची दहशत आहे. पण आमची दहशत ही आदरयुक्त दहशत आहे. कुठेही अन्याय होत असेल तर मी धावून जाणारच. सगळे म्हणतात, एमपी म्हणजे 'मेंबर ऑफ पार्लमेंट' पण माझ्यासाठी एमपी म्हणजे मिलीटरी पोलिस, असंही उदयनराजे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा