शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
3
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
4
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
5
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
6
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
7
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
8
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
9
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
10
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
11
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
12
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
13
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
14
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
15
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
16
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

गोवा- मुंबई प्रवास होणार सहा तासांत

By admin | Updated: September 22, 2016 18:58 IST

गोव्यात रस्ते, महामार्ग, पुल, बंदरे, नद्या उसपणो, जलमार्गाचा विकास अशा अनेक प्रकल्पांसाठी एकूण वीस हजार कोटींचा निधी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज जाहीर केला आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २२ : गोव्यात रस्ते, महामार्ग, पुल, बंदरे, नद्या उसपणो, जलमार्गाचा विकास अशा अनेक प्रकल्पांसाठी एकूण वीस हजार कोटींचा निधी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे जाहीर केला. येत्या दोन वर्षात हा निधी खर्च केला जाईल. तसेच गोवा-मुंबई महामार्गाचे काँक्रिटीकरण व चौपदरीकरण केले जाणार असून त्यामुळे गोमंतकीय सहा तासांत मुंबईस पोहचू शकतील, असे गडकरी म्हणाले.

मुरगाव पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) आणि गोवा सी-पोर्ट प्रा. लिमिटेड यांच्यात गुरुवारी करारावर सही झाली. एमपीटीच्या आठ व नऊ क्रमांकाच्या धक्क्याच्या फेरविकासासाठी हा करार आहे. 1 हजार 145.36 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर येणार आहे. एमपीटीसाठी 2क्क् केव्ही क्षमतेच्या सौरउज्रेचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा मिरामार येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, वीज मंत्री मिलिंद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, एमपीटीचे चेअरमन आय.जे. कुमार, सी-पोर्ट कंपनीचे संचालक अशोक कुमार, मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव आदी व्यासपीठावर होते.

गोव्यात महामार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून आठ किलोमीटरचा नवा महामार्ग बांधला जाईल. गोव्यात नवे बंदर उभे केले जाईल. मांडवी व जुवारी या दोन नद्या 31 ठिकाणी उसपल्या जातील. जलमार्ग यामुळे विकसित होतील व त्याचा लाभ गोव्याला होईल. एमपीटीने समुद्र उसपून बंदराची खोली 14 मीटरवरून 19 मीटरपेक्षा जास्त करण्याचे ठरविले आहे, असे गडकरी यांनी सांगितले. एकूण वीस हजार कोटी रुपये आम्ही गोव्यासाठी खर्च करू. काही कामांसाठी गोवा सरकारकडून आम्हाला अजुन परवानगीची गरज आहे, असेही ते म्हणाले. गोव्याची वाहतूक हरित पद्धतीने व्हायला हवी. त्यासाठी सीएनजीचा वापर वाढावा म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करील.

गोव्यातील अपघातांच्या जागा सरकारने शोधून काढाव्यात. त्यावर उपाय काढण्यासाठी आम्ही निधी देऊ, असे गडकरी यांनी सांगितले. गोव्यातील बंदरांच्या विकासामुळे मच्छीमारांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांनाही अर्थसाह्य करू व त्यामुळे ते 12 सागरी मैलांच्याही पलिकडे जाऊन मासेमारी करू शकतील. वास्को शहर व एमपीटीमध्ये जो वाद आहे, त्यावर योग्य तोडगा काढू. मच्छीमारांचे हित आम्ही जपू. गोव्यात जेटींचा विकास करू, असे गडकरी यांनी जाहीर केले.

मुंबईस पोहचा सहा तासांतगोवा- मुंबई महामार्गाचे चौपदीकरण केले जाणार आहे. पूर्ण काँक्रिटचा हा महामार्ग होईल. त्यामुळे वाहतुकीतील वेळ खूपच कमी होईल व गोमंतकीयांना सहा तासांत मुंबई गाठता येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. जलमार्ग, बंदरे व किनारपट्टी विकासासाठी देशभर सागरमाला प्रकल्प राबविला जाणार आहे. एकूण 12 लाख कोटींची गुंतवणूक त्यानिमित्ताने सागरी राज्यांमध्ये होईल. देशात सध्या दिवसाला आम्ही 22 किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करत आहोत.

यापुढे 42 किलोमीटर प्रती दिन काम करण्याचे लक्ष्य आहे, असे गडकरी यांनी सांगितले. समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर गोव्यात उभा करण्याचे सूतोवाचही गडकरी यांनी केले. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी गडकरी यांच्या कामाच्या वेगाची स्तुती केली. गडकरी यांच्यामुळे गोव्याला खूप लाभ होत आहे. जुवारी नदीवर नवा पुल यापुढे साकारणार आहे. पुलामुळे बांबोळीपासून वेर्णार्पयत नवे रस्ते अस्तित्वात येतील. पुलापेक्षाही जास्त खर्च या रस्त्यांच्या कामावर केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.