शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

गोवा- मुंबई प्रवास होणार सहा तासांत

By admin | Updated: September 22, 2016 18:58 IST

गोव्यात रस्ते, महामार्ग, पुल, बंदरे, नद्या उसपणो, जलमार्गाचा विकास अशा अनेक प्रकल्पांसाठी एकूण वीस हजार कोटींचा निधी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज जाहीर केला आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २२ : गोव्यात रस्ते, महामार्ग, पुल, बंदरे, नद्या उसपणो, जलमार्गाचा विकास अशा अनेक प्रकल्पांसाठी एकूण वीस हजार कोटींचा निधी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे जाहीर केला. येत्या दोन वर्षात हा निधी खर्च केला जाईल. तसेच गोवा-मुंबई महामार्गाचे काँक्रिटीकरण व चौपदरीकरण केले जाणार असून त्यामुळे गोमंतकीय सहा तासांत मुंबईस पोहचू शकतील, असे गडकरी म्हणाले.

मुरगाव पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) आणि गोवा सी-पोर्ट प्रा. लिमिटेड यांच्यात गुरुवारी करारावर सही झाली. एमपीटीच्या आठ व नऊ क्रमांकाच्या धक्क्याच्या फेरविकासासाठी हा करार आहे. 1 हजार 145.36 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर येणार आहे. एमपीटीसाठी 2क्क् केव्ही क्षमतेच्या सौरउज्रेचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा मिरामार येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, वीज मंत्री मिलिंद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, एमपीटीचे चेअरमन आय.जे. कुमार, सी-पोर्ट कंपनीचे संचालक अशोक कुमार, मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव आदी व्यासपीठावर होते.

गोव्यात महामार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून आठ किलोमीटरचा नवा महामार्ग बांधला जाईल. गोव्यात नवे बंदर उभे केले जाईल. मांडवी व जुवारी या दोन नद्या 31 ठिकाणी उसपल्या जातील. जलमार्ग यामुळे विकसित होतील व त्याचा लाभ गोव्याला होईल. एमपीटीने समुद्र उसपून बंदराची खोली 14 मीटरवरून 19 मीटरपेक्षा जास्त करण्याचे ठरविले आहे, असे गडकरी यांनी सांगितले. एकूण वीस हजार कोटी रुपये आम्ही गोव्यासाठी खर्च करू. काही कामांसाठी गोवा सरकारकडून आम्हाला अजुन परवानगीची गरज आहे, असेही ते म्हणाले. गोव्याची वाहतूक हरित पद्धतीने व्हायला हवी. त्यासाठी सीएनजीचा वापर वाढावा म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करील.

गोव्यातील अपघातांच्या जागा सरकारने शोधून काढाव्यात. त्यावर उपाय काढण्यासाठी आम्ही निधी देऊ, असे गडकरी यांनी सांगितले. गोव्यातील बंदरांच्या विकासामुळे मच्छीमारांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांनाही अर्थसाह्य करू व त्यामुळे ते 12 सागरी मैलांच्याही पलिकडे जाऊन मासेमारी करू शकतील. वास्को शहर व एमपीटीमध्ये जो वाद आहे, त्यावर योग्य तोडगा काढू. मच्छीमारांचे हित आम्ही जपू. गोव्यात जेटींचा विकास करू, असे गडकरी यांनी जाहीर केले.

मुंबईस पोहचा सहा तासांतगोवा- मुंबई महामार्गाचे चौपदीकरण केले जाणार आहे. पूर्ण काँक्रिटचा हा महामार्ग होईल. त्यामुळे वाहतुकीतील वेळ खूपच कमी होईल व गोमंतकीयांना सहा तासांत मुंबई गाठता येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. जलमार्ग, बंदरे व किनारपट्टी विकासासाठी देशभर सागरमाला प्रकल्प राबविला जाणार आहे. एकूण 12 लाख कोटींची गुंतवणूक त्यानिमित्ताने सागरी राज्यांमध्ये होईल. देशात सध्या दिवसाला आम्ही 22 किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करत आहोत.

यापुढे 42 किलोमीटर प्रती दिन काम करण्याचे लक्ष्य आहे, असे गडकरी यांनी सांगितले. समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर गोव्यात उभा करण्याचे सूतोवाचही गडकरी यांनी केले. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी गडकरी यांच्या कामाच्या वेगाची स्तुती केली. गडकरी यांच्यामुळे गोव्याला खूप लाभ होत आहे. जुवारी नदीवर नवा पुल यापुढे साकारणार आहे. पुलामुळे बांबोळीपासून वेर्णार्पयत नवे रस्ते अस्तित्वात येतील. पुलापेक्षाही जास्त खर्च या रस्त्यांच्या कामावर केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.