शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांपर्यंत आईचेच दूध द्या

By admin | Updated: August 6, 2016 01:33 IST

अनेकदा माता मुलांना दोन ते तीन महिन्यांचे झाल्यानंतर त्याला पाणी पाजतात किंवा मुलांच्या पोषणासाठी विकतचे दूध पाजतात.

मुंबई : अनेकदा माता मुलांना दोन ते तीन महिन्यांचे झाल्यानंतर त्याला पाणी पाजतात किंवा मुलांच्या पोषणासाठी विकतचे दूध पाजतात. प्रत्यक्षात मात्र बाळांना पहिल्या सहा महिन्यांपर्यंत आईचे दूध हाच पुरेसा आणि सकस आहार असतो. आईच्या दुधातून त्यांना आवश्यक ती पोषकतत्त्वे मिळतात आणि त्यांच्या वाढीस उपयुक्त ठरतात. पण, आईच्या दुधाशिवाय अन्य दूध दिल्यास त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होऊ शकतो, असे कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले. सहा महिन्यांहून अधिक काळ मातांनी स्तनपान केल्यास ते बाळाच्या आणि मातांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. जन्माला आल्यानंतरही पुढच्या सहा महिन्यांत बाळाची वाढ होत असते. या कालावधीत त्याला उत्तम पोषक तत्त्वांसाठी आईचे दूध पुरेसे असते. आईच्या दुधात कोलेस्टोन असते. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर बाळाच्या आतड्याची वाढ होण्यास हे महत्त्वाचे असते. लहानपणीच बाळाच्या आतड्याची वाढ चांगल्या पद्धतीने झाल्यास पुढे बाळाचे आरोग्य सुदृढ राहते. सध्या बहुतांश माता नोकरी करतात. त्यामुळे प्रसूतीनंतर काही महिन्यांतच त्यांना नोकरीला जावे लागते. अशावेळी मातांना बाळाला दूध कसे पाजायचे? असा प्रश्न पडतो. माता बाळांना विकतचे दूध पाजतात. पण, त्यापेक्षा मातांनी सकाळी जाताना दूध काढून फ्रीजमध्ये ठेवल्यास २४ तास ते चांगले राहते. बाळाला हे दूध अन्य घरातील व्यक्ती पाजू शकतात. त्यामुळे बाळाला दूध पाजायचे असेल तेव्हा थोडा वेळ आधी बाहेर काढून ठेवावे, असे डॉ. कटके यांनी सांगितले.