शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

आमचे मनोबल कायम राहण्यासाठी लोकसभेची एक तरी जागा द्या : आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 10:51 AM

सध्या तरी आपण एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु आमचे मनोबल कायम राहण्यासाठी आम्हाला लोकसभेची एक तरी जागा द्यावी, असे आठवले यांनी म्हटले आहे.

मुंबई - प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे आपल्याला आव्हान नाही. ते माझे चांगले मित्र आहेत. वचिंत बहुजन आघाडीला जनतेतून मिळत असलेला प्रतिसाद पाहून मला आनंदच होत आहे. परंतु त्यांच्या आघाडीचा फायदा शिवसेना-भाजपलाच होणार असा दावा केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच आमचे मनोबल कायम राहण्यासाठी आम्हाला लोकसभेची एक तरी जागा द्यावी, अशी मागणीही आठवले यांनी केली आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एमआयएमच्या साथीत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. तसेच अनेक ठिकाणचे उमेदवार देखील जाहीर केले. याविषयी आठवले यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी वंचित आघाडीचे आपल्याला आव्हान नसल्याचे म्हटले आहे.

यावेळी आठवले म्हणाले की, भाजप-शिवसेना युतीने महाराष्ट्रात एक तरी जागा सोडणे अपेक्षित होते. मी मुंबई उत्तर-पूर्व किंवा मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून इच्छूक होतो. या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्याशी बोललो होतो. पण त्याचा काही फायदा झाला नाही. सध्या तरी आपण एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु आमचे मनोबल कायम राहण्यासाठी आम्हाला लोकसभेची एक तरी जागा द्यावी, असही आठवले यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRamdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाShiv Senaशिवसेना