शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

इंदु मिलचा निधी वाडिया रुग्णालयाला द्या : प्रकाश आंबेडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 20:42 IST

‘नाईट लाईफ’ हवीच

ठळक मुद्देस्मारकामध्ये स्कुल ऑफ थॉट्स उभारा

पुणे : ‘इंदु मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे, हे अपेक्षित नाही. त्यामुळे पुतळा व सुशोभिकरणासाठी शासनाने दिलेला सर्व निधी मुंबईतील वाडिया रुग्णालयाला द्यावा,’ अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्यालाच विरोध दर्शविला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. इंदु मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची साडेतीनशे फुटांपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने मुंबईतील वाडिया रुग्णालयासंदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान शासनाला खडे बोल सुनावले.पुतळ्याची उंची वाढविण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत, मात्र आरोग्यसेवेसाठी नाहीत. पुतळे महत्वाचे आहेत की रुग्णालये, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता. न्यायालयाची ही भुमिका योग्य असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, इंदु मिलची जागा पुतळ्यासाठी देण्यात आलेली नाही. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ही जागा ‘इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्टडीज’साठी दिली होती. देशाला आज आंतरराष्ट्रीय राजकारणातील विचार आत्मसात करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने ही जागा बौध्दिक गोष्टींसाठीच वापरायला हवी. याबाबत वायपेयी यांच्याशी चर्चा झाली होती. त्यासाठीच त्यांनी जागा दिली. त्यामुळे या जागेत ‘स्कुल फ थॉट्स’ची उभारणी करायला हवी. इंदु मिलच्या जागेवर सुरू असलेले सुशोभीकरण व पुतळ््यासाठी शासनाने दिलेला सर्व निधी वाडिया रुग्णालयाला द्यावा. तसा आदेशच न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी आंबेकडर यांनी केली. ------------------‘नाईट लाईफ’ हवीचपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाईफच्या भुमिकेचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी समर्थन केले आहे. ‘मी स्वत: नाईट लाईफचे आयुष्य जगलो आहे. महानगरांसह ज्या शहरांमध्ये दिवसा आठ ते दहा तासांचे काम करावे लागते, तिथे लोकांना दिवसा सामाजिक आयुष्यच नसते. त्यांना दिवसा वेळच मिळत नाही. त्यांना रात्रीच्या वेळ हे आयुष्य जगता यायला हवे. त्यामुळे नाईट लाईफला माझा पाठिंबा आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.--------------केंद्र सरकारे दारूड्यासारखे‘‘दारूड्याला मद्यपानासाठी पैसे मिळाले नाहीत की तो घरातील सर्व साहित्य विकायला सुरूवात करतो. तसे केंद्र सरकारने महसुली तुट भरून काढण्यासाठी भारत पेट्रोलियम ही अंडे देणारे कोंबडी तसेच इतर संस्था विकायला काढल्या आहेत. त्यामुळे हे सरकार दारूड्यासारखे वागत आहे,’’ अशी टीका अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली.

...............

‘महाराष्ट्र बंद’ची हाकवंचित बहुजन आघाडीने एनआरसी, सीएए आणि एनपीआर विरोधात  २४ जानेवारीला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. ‘‘भाजपा, आरएसएससह काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्ष केवळ मुस्लिम समाजालाच फटका बसणार असल्याचे सांगत आहेत. हिंदुंनाही याचा फटका बसणार असल्याची भूमिका मीच मांडत आहे,’’ असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार