शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांना तात्काळ मदत द्या, अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही : राधाकृष्ण विखे- पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:23 IST

राज्यात भीषण दुष्काळ निर्माण झाल्याने सरकारने दुष्काळग्रस्तांना तात्काळ मदत घ्यावी, अन्यथा विधीमंडळाचे अधिवेशन बंद पाडू

ठळक मुद्देउजनीच्या पाण्याला विरोध नाहीजलयुक्त की झोलयुक्त शिवार?

बेलकुंड ( लातूर ) : राज्यात भीषण दुष्काळ निर्माण झाल्याने सरकारने दुष्काळग्रस्तांना तात्काळ मदत घ्यावी, अन्यथा सोमवारपासून सुरू होत असलेले राज्य विधीमंडळाचे अधिवेशन बंद पाडू, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिला.

औसा तालुक्यातील बेलकुंड, उजनी, सोन चिंचोली, हिप्परगा, माळकोंडजी, देवताळा व लोहटा आदी गावांतील दुष्काळाची पाहणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाअील यांनी केली़ यावेळी माजी राज्यमंत्री आ. बसवराज पाटील, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार शोभा पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे आदी उपस्थित होते.

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर विखे- पाटील म्हणाले, दुष्काळ जाहीर करण्याची पद्धतच या सरकारची चुकीची आहे़ त्यामुळे हे सरकार दुष्काळाच्या बाबतीत असंवेदनशील व बेजबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे़ सरकार केवळ घोषणा करत उपग्रहाद्वारे दुष्काळ जाहीर करत आहे़ आघाडी सरकारच्या काळात दुष्काळ पडला असता आमच्या सरकारने कसलाच विलंब न करता शेतकऱ्यांना मदत केली़ मात्र, या सरकारला शेतकऱ्यांपेक्षा अवनी वाघिणीची चिंता जास्त आहे़ विरोधक चुकीची माहिती पसरवत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर त्यांनी खरी वस्तुस्थिती सांगावी असेही ते म्हणाले़

उजनीच्या पाण्याला विरोध नाहीलातूरला उजनीचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे़ त्याला माझा विरोध असण्याचे काही कारण नाही़ लातूरला पाणी देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला असून तो पाणी लवाद्यानेदेखील मान्य केला आहे़ याबाबत सरकार वेळकाढू धोरण अवलंबत आहे, अशी टीकाही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केली़

जलयुक्त की झोलयुक्त शिवार?राज्य शासनाने मोठी जाहिरातबाजी करीत जलयुक्त शिवार यशस्वी झाल्याचे सांगितले़ पण आजघडीला गावोगावी मोठी पाणीटंचाई असून हे जलयुक्त शिवार होते, की झोलयुक्त शिवार? शिवाय, संबंधीची आकडेवारी आमच्याकडे आली असून यावर ८ हजार कोटी रुपये कुठे खर्च केले आहे, त्याचा जाब शासनाला अधिवेशनात विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलdroughtदुष्काळlaturलातूरVidhan Bhavanविधान भवनState Governmentराज्य सरकार