शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

दुष्काळग्रस्तांना तात्काळ मदत द्या, अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही : राधाकृष्ण विखे- पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:23 IST

राज्यात भीषण दुष्काळ निर्माण झाल्याने सरकारने दुष्काळग्रस्तांना तात्काळ मदत घ्यावी, अन्यथा विधीमंडळाचे अधिवेशन बंद पाडू

ठळक मुद्देउजनीच्या पाण्याला विरोध नाहीजलयुक्त की झोलयुक्त शिवार?

बेलकुंड ( लातूर ) : राज्यात भीषण दुष्काळ निर्माण झाल्याने सरकारने दुष्काळग्रस्तांना तात्काळ मदत घ्यावी, अन्यथा सोमवारपासून सुरू होत असलेले राज्य विधीमंडळाचे अधिवेशन बंद पाडू, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिला.

औसा तालुक्यातील बेलकुंड, उजनी, सोन चिंचोली, हिप्परगा, माळकोंडजी, देवताळा व लोहटा आदी गावांतील दुष्काळाची पाहणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाअील यांनी केली़ यावेळी माजी राज्यमंत्री आ. बसवराज पाटील, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार शोभा पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे आदी उपस्थित होते.

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर विखे- पाटील म्हणाले, दुष्काळ जाहीर करण्याची पद्धतच या सरकारची चुकीची आहे़ त्यामुळे हे सरकार दुष्काळाच्या बाबतीत असंवेदनशील व बेजबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे़ सरकार केवळ घोषणा करत उपग्रहाद्वारे दुष्काळ जाहीर करत आहे़ आघाडी सरकारच्या काळात दुष्काळ पडला असता आमच्या सरकारने कसलाच विलंब न करता शेतकऱ्यांना मदत केली़ मात्र, या सरकारला शेतकऱ्यांपेक्षा अवनी वाघिणीची चिंता जास्त आहे़ विरोधक चुकीची माहिती पसरवत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर त्यांनी खरी वस्तुस्थिती सांगावी असेही ते म्हणाले़

उजनीच्या पाण्याला विरोध नाहीलातूरला उजनीचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे़ त्याला माझा विरोध असण्याचे काही कारण नाही़ लातूरला पाणी देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला असून तो पाणी लवाद्यानेदेखील मान्य केला आहे़ याबाबत सरकार वेळकाढू धोरण अवलंबत आहे, अशी टीकाही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केली़

जलयुक्त की झोलयुक्त शिवार?राज्य शासनाने मोठी जाहिरातबाजी करीत जलयुक्त शिवार यशस्वी झाल्याचे सांगितले़ पण आजघडीला गावोगावी मोठी पाणीटंचाई असून हे जलयुक्त शिवार होते, की झोलयुक्त शिवार? शिवाय, संबंधीची आकडेवारी आमच्याकडे आली असून यावर ८ हजार कोटी रुपये कुठे खर्च केले आहे, त्याचा जाब शासनाला अधिवेशनात विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलdroughtदुष्काळlaturलातूरVidhan Bhavanविधान भवनState Governmentराज्य सरकार